शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:06 IST

महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक : महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.  ‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्रमानिमित्त मविप्र संस्थेच्या अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. खासदार सुळे म्हणाल्या की, कोणत्याही देशात २८ टक्के कर दिला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती.  मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी  लगावला.  सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खासदार सुळे यांनी याप्रसंगी दिला.शिवसेना-भाजपाचे भांडण व्हेरी फनीराज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना व भाजपामधील संबंध अत्यंत टोकाला पोहोचल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, सकाळी भांडायचे आणि सायंकाळी सोबत चहा प्यायचा. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या भांडणाकडे आता फारसे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांचे मतभेद म्हणजे आता व्हेरी फनी वाटत असल्याने मीदेखील यावर भाष्य करणे आता सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.अशोक चव्हाण बाजीगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा राखून प्रचार केल्यामुळे नांदेडच्या नागरिकांनी त्यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला. या निवडणुकीत शिवसेना, भाजपाने अत्यंत खालच्या थरावर प्रचार केला. राज्यात इतक्या खालच्या थरावर प्रचार कधी पोहोचला नव्हता. राजकीय प्रचाराची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याबाबत खेद वाटत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.