शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:06 IST

महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नाशिक : महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी हिताविरोधात असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास याविरोधात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.  ‘जागर युवा संवादाचा’ कार्यक्रमानिमित्त मविप्र संस्थेच्या अ‍ॅड. बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मविप्र संचालक नानासाहेब महाले, सचिन पिंगळे उपस्थित होते. जीएसटी, कर्जमाफी, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आदी धोरणांविषयी त्यांनी केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. खासदार सुळे म्हणाल्या की, कोणत्याही देशात २८ टक्के कर दिला जात नाही. जीएसटी लागू करण्यापूर्वी करदात्यांना साधारणत: वर्षभर अवधी देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आम्ही केली होती.  मात्र, निर्णय घेताना परिणामांची मिमांसा न करणाºया सरकाराने आता यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दबावतंत्राचा वापर सुरू केला आहे. कर्जमाफीचा अर्ज चुकला की फौजदारी, व्यावसायिकांनी जीएसटी नाही भरला की फौजदारी करायची. त्यामुळे या सकारला काम करण्यापेक्षा फौजदारी करण्यामध्ये फार रस असल्याचा टोलाही त्यांनी  लगावला.  सरकार योग्य निर्णय घेते. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. निवडणूक निकालांच्या वातावरणातून बाहेर पडून या सरकारने आता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, शेतकरी-व्यापाºयांशी चर्चा करून त्यांना जाणवणाºया समस्यांवर वेळीच तोडगा काढवा. केवळ सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून असाच दबावतंत्राचा वापर होत राहिल्यास भविष्यात पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही खासदार सुळे यांनी याप्रसंगी दिला.शिवसेना-भाजपाचे भांडण व्हेरी फनीराज्यातील सत्ताधारी पक्ष शिवसेना व भाजपामधील संबंध अत्यंत टोकाला पोहोचल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या, सकाळी भांडायचे आणि सायंकाळी सोबत चहा प्यायचा. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या भांडणाकडे आता फारसे कोणी गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यांचे मतभेद म्हणजे आता व्हेरी फनी वाटत असल्याने मीदेखील यावर भाष्य करणे आता सोडून दिल्याचे त्यांनी सांगितले.अशोक चव्हाण बाजीगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिष्ठा राखून प्रचार केल्यामुळे नांदेडच्या नागरिकांनी त्यांच्यावर संपूर्ण विश्वास दाखविला. या निवडणुकीत शिवसेना, भाजपाने अत्यंत खालच्या थरावर प्रचार केला. राज्यात इतक्या खालच्या थरावर प्रचार कधी पोहोचला नव्हता. राजकीय प्रचाराची पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याबाबत खेद वाटत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.