शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराण्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
4
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
5
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
6
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
7
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
8
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
9
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
10
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
11
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
12
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
13
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
14
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
15
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
16
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
17
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
18
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
19
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
20
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा

भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद

By admin | Updated: March 26, 2017 22:58 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला असून, केबल टाकण्यासाठी खोदलेली चारी ठेकेदाराने न बुजविल्याचा हा परिणाम असल्याचे कळते. त्यावेळेस भोरटे शिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला फोरजी केबल टाकण्यासाठी खोलवर चारी करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची चारी बुजवली नसल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढता येत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सदर रस्त्यावरील चारी बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. नवी बेज येथील गिरणा नदीकाठालगतच्या भोरटे शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून, या शिवारातील सर्व शेती बारमाही बागायती असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलवर चारी असून, मोठ्या प्रमाणात खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावरून फक्त पायवाटेएवढी जागा येण्या-जाण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचा गहू, कांदा, हरभरा काढणीवर आला असून, या परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्र, ट्रॅक्टर, गाडीबैल जाण्यासाठीचा पूर्वीपासून असलेला हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, संबंधितांकडून शेतकऱ्यांचा हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करून मिळावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, पोपटराव पवार, दिलीप देशमुख, जिभाऊ बच्छाव, दगा पवार, अतुल पवार, हरिदास बागुल, महेंद्र देवरे या शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरतसध्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीवर आला असून, रस्त्यावर चारी केलेली असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी सदर रस्ता सुरळीत करून मिळावा यासाठी संबंधित ठेकेदारास सांगूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढलेला शेतमाल शेतात पडून आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सदर रस्ता कधी सुरळीत करून मिळणार याकडे लक्ष लागून आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता तालुका प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते व काय भूमिका घेते याकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.