शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद

By admin | Updated: March 26, 2017 22:58 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला असून, केबल टाकण्यासाठी खोदलेली चारी ठेकेदाराने न बुजविल्याचा हा परिणाम असल्याचे कळते. त्यावेळेस भोरटे शिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला फोरजी केबल टाकण्यासाठी खोलवर चारी करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची चारी बुजवली नसल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढता येत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सदर रस्त्यावरील चारी बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. नवी बेज येथील गिरणा नदीकाठालगतच्या भोरटे शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून, या शिवारातील सर्व शेती बारमाही बागायती असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलवर चारी असून, मोठ्या प्रमाणात खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावरून फक्त पायवाटेएवढी जागा येण्या-जाण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचा गहू, कांदा, हरभरा काढणीवर आला असून, या परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्र, ट्रॅक्टर, गाडीबैल जाण्यासाठीचा पूर्वीपासून असलेला हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, संबंधितांकडून शेतकऱ्यांचा हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करून मिळावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, पोपटराव पवार, दिलीप देशमुख, जिभाऊ बच्छाव, दगा पवार, अतुल पवार, हरिदास बागुल, महेंद्र देवरे या शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरतसध्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीवर आला असून, रस्त्यावर चारी केलेली असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी सदर रस्ता सुरळीत करून मिळावा यासाठी संबंधित ठेकेदारास सांगूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढलेला शेतमाल शेतात पडून आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सदर रस्ता कधी सुरळीत करून मिळणार याकडे लक्ष लागून आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता तालुका प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते व काय भूमिका घेते याकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.