शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

भोरटे शिवारात जाणारा रस्ता रहदारीसाठी बंद

By admin | Updated: March 26, 2017 22:58 IST

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला आहे.

पिळकोस : कळवण तालुक्यातील नवी बेज येथील राज्य महामार्ग क्र मांक १७ वरील सबस्टेशनला लागून असलेल्या भोरटे शिवारात जाणारा रस्ता सात ते आठ महिन्यांपासून रहदारीसाठी पूर्णत: बंद झालेला असून, केबल टाकण्यासाठी खोदलेली चारी ठेकेदाराने न बुजविल्याचा हा परिणाम असल्याचे कळते. त्यावेळेस भोरटे शिवारात जाणाऱ्या रस्त्याच्या सुरुवातीला फोरजी केबल टाकण्यासाठी खोलवर चारी करण्यात आली. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची चारी बुजवली नसल्याने या शिवारातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाहेर काढता येत नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदारास सदर रस्त्यावरील चारी बुजवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करून देण्याची मागणी केली असता संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. नवी बेज येथील गिरणा नदीकाठालगतच्या भोरटे शिवारात मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी असून, या शिवारातील सर्व शेती बारमाही बागायती असल्याने या शिवारातील शेतकऱ्यांचा हा पूर्वीपासूनचा वहिवाटीचा रस्ता आहे. आज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोलवर चारी असून, मोठ्या प्रमाणात खडीचे ढीग असल्याने या रस्त्यावरून फक्त पायवाटेएवढी जागा येण्या-जाण्यासाठी आहे. आज शेतकऱ्यांचा गहू, कांदा, हरभरा काढणीवर आला असून, या परिसरात गहू काढणीसाठी हार्वेस्टर यंत्र, ट्रॅक्टर, गाडीबैल जाण्यासाठीचा पूर्वीपासून असलेला हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून, संबंधितांकडून शेतकऱ्यांचा हा रस्ता लवकरात लवकर वाहतुकीस सुरळीत करून मिळावा अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार, पोपटराव पवार, दिलीप देशमुख, जिभाऊ बच्छाव, दगा पवार, अतुल पवार, हरिदास बागुल, महेंद्र देवरे या शेतकरी बांधवांनी दिला आहे. (वार्ताहर)शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरतसध्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल काढणीवर आला असून, रस्त्यावर चारी केलेली असल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. शेतकऱ्यांनी सदर रस्ता सुरळीत करून मिळावा यासाठी संबंधित ठेकेदारास सांगूनही ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने आज शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाहेर काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचा काढलेला शेतमाल शेतात पडून आहे. या परिसरातील शेतकऱ्यांचे सदर रस्ता कधी सुरळीत करून मिळणार याकडे लक्ष लागून आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आता तालुका प्रशासन याकडे किती गांभीर्यपूर्वक पाहते व काय भूमिका घेते याकडे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.