शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी चेंबर्स झाकून रस्ते झाले चकाचक

By admin | Updated: May 23, 2014 01:07 IST

लोकमत विशेष

लोकमत विशेष डांबरीकरण जोरात : कुठे बुजले तर कुठे ठरताहेत धोकेदायकनाशिक : पावसाळ्यापूर्वी रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांनी शहरात वेग घेतला असून, शहरातील मुख्य रस्त्यासह उपनगरीय रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र डांबरीकरण करीत असतानाच पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी जे भुयारी गटारींचे ढापे आहेत त्यांची छिदे्रच बुजली गेल्याने पाणी तुंबण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी हे ढापे डांबरीकरणाच्या पातळीच्या खाली गेल्याने वाहनधारकांसाठी धोक्याचे नाही तर जीवघेणे ठरत आहेत. नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे आचारसंहितेत अडकल्याने सुमारे दोन-अडीच महिने कोणतीही कामे होऊ शकली नाहीत. जी कामे मंजूर होती तीही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिरंगाईने व संथगतीने सुरू झाली. निवडणूक निकाल जाहीर होताच कामांना वेग आला असून, यात डांबरीकरणाची कामे प्रामुख्याने होताना दिसत आहेत. डांबरीकरणाने रस्ते चकाचकआचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये शहरातील विकासकामे ठप्प झाली होती. निवडणुकीनंतर रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांनी वेग घेतला आहे. शहरातील त्र्यंबक नाका ते मायको सर्कल, शरणपूर पोलीस चौकी ते एबीबी सर्कल, सीबीएस ते टिळकपथ, टिळकपथ ते कॅनडा कॉर्नर या मुख्य रस्त्यांसह उपनगरीय परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे सदरचे रस्ते चकाकले असले तरी या रस्त्यांदरम्यान येणार्‍या पावसाळी भुयारी गटारींचे ढापे बुजले गेले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये रस्त्यावरचे पाणी जाण्यास मार्ग राहिलेला नसल्याने पाण्याची तळी साचण्याचीच अधिक शक्यता आहे. चेंबरचे ढापे बुजलेरस्त्यांचे डांबरीकरण करीत असताना मूळ रस्त्यावर डांबरच्या थरावर जाड खडीचा, त्यावर बारीक खडीचा थर टाकला जातो. त्यावर डांबर नसलेल्या बारीक खडीचा थर मारला जातो. त्यामुळे मूळ रस्त्यापासून किमान तीन ते चार इंच उंचीचा नवीन रस्ता तयार होतो. त्यामुळे या रस्त्यादरम्यान पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी केलेले भुयारी गटारीचे चेंबर्स असतात ते रस्ता करताना बुजले गेले आहेत. या चेंबर्सला पाणी जाण्यासाठी जाळ्यांचे ढापे असतात. त्यावरच डांबरीकरण झाल्याने जाळ्या बुजल्या गेल्या आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात पाणी जाण्यासाठीच जागा नसल्याने पाण्याची तळी साचली जातील. असा प्रकार सीबीएस सिग्नल ते टिळकपथ आणि टिळकपथ ते कॅनडा कॉर्नर दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण करताना ढापेच बुजले गेले आहेत. याठिकाणी पावसाळ्यात पाणी साचत असते. ते अधिक साचून धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी याचठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, तर सुयोजित संकुलच्या तळमजल्यातील दुकानांमध्ये पाणी शिरले होते.कुठे ढापे बनले धोकादायकअनेक ठिकाणी डांबरीकरण करताना रस्त्यांमध्येच आलेल्या भुयारी गटारींचे चेंबर्स बुजविण्यात आले नसल्याने त्याठिकाणी खड्डा तयार झाला आहे. त्यामुळे भरधाव वेगाने येणार्‍या वाहनाचालकाला रस्त्याच्या मधोमध असलेला हा खड्डा झटकन लक्षात येत नाही आणि चेंबरचा खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. कॅनडा कॉर्नरकडून शरणपूर पोलीस चौकीकडे येणार्‍या रस्त्याच्या मधोमधच किमान तीन ते चार चेंबर्सचे खड्डे तयार झाले आहेत. रस्ता करताना सदरचे ढापे उचकवून ते रस्त्याच्या समांतर आणणे गरजेचे असताना तसे न करताच काम करण्यात आले आहे. ----- जोड -----------