शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भाजीबाजारामुळे रस्ता बंद

By admin | Updated: January 23, 2017 22:50 IST

हिरावाडी, कमलनगर : महापालिकेचे दुर्लक्ष; अपघातांत वाढ

पंचवटी : हिरावाडीतील कमलनगर येथे दर सोमवारच्या दिवशी भर वाहतुकीच्या रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजारामुळे वाहतुकीचा रस्ता पूर्णपणे बंद होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय भाजीविक्रेत्यांचे जाळे वाढतच चालल्याने ते थेट मुख्य रस्त्यापाठोपाठ महामार्ग रस्त्याच्या कडेला ठाण मांडून बसत असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून भरणाऱ्या या भाजीबाजाराकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर भरणारा हा भाजीबाजार हटविणार कोण, असा सवाल परिसरातील संतप्त नागरिकांनी केला आहे.  सोमवारी रस्त्यावर भरणाऱ्या आठवडे बाजारातील भाजीविक्रेते बाजार आटोपल्यानंतर भाजीपाला थेट रस्त्यावर फेकतात त्यामुळे परिसरात कचरा साचतो, शिवाय मोकाट जनावरांचाही उपद्रव वाढत आहे. रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे नागरिकांना वाहने नेणे सोडाच तर पायी चालणेदेखील अवघड होत आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून येथे भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे सोमवारच्या दिवशी कमलनगरकडून क्रीडा संकुलकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहात असल्याने त्याचा फटका परिसरातील शेकडो वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.  रस्त्यावर भरणाऱ्या या भाजीबाजारामुळे अपघाताची दाट शक्यता असून याबाबत महापालिकेने तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)