शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:10 IST

वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य नागरिकच अडचणीत हवालदारानेच तक्रार केल्याचा विषय गाजला कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन

नाशिक : वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही. साहजिक नियम पालनापेक्षा अधिक भर वसुलीवर असल्याने पोलिसांचे कर्तव्यपालन नागरिकांना मात्र जाच ठरत आहे.शहरात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यातच अपुºया भौतिक सुविधा यामुळे समस्या जटिल होत चालली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकच अडचणीत आणले जातात. मुळात वाहतूक पोलिसांना नियुक्त करताना कोणते निकष लावले जातात हे जणू उघड गुपित आहे. मुंबईच्या एका हवालदारानेच याबाबत तक्रार केल्याचा विषय राज्यभरात गाजला होता. परंतु अशा टार्गेटपूर्तीसाठी सर्वसामान्य वेठीस धरले जातात. अनेक ठिकाणी तर भल्या सकाळी दिवसभराचे टार्गेट वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एकदा केसेसची शासकीय उद्दिष्टपूर्ती झाली की पुढे काय होते हे वेगळे विचारण्याची गरज नाही. पोलिसांच्या या वसुलीची महाराष्टÑाबाहेरही चर्चा पसरली आहे. त्र्यंबकरोडला जाताना येणाºया अडचणी हे अनेक देशांतील वाहतूक व्यावसायिकांना मनस्ताप देणारे ठरले आहे. एकदा तर अकारण वसुलीचा प्रयत्न झाल्यानंतर परराज्यातील भाविकांनी रस्त्यावरच ठाण मांडून पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर मांडली होती.अलीकडे तर मोहिमा अगोदरच सोशल मीडियावरून व्हायरल होतात आणि त्यानंतर पोलिसांच्या जाचापासून सुटका करण्यासाठी नागरिकांना मार्ग बदल करावे लागतात. सुरक्षिततेची काळजी प्रत्येकाला असते आणि त्यात कसूर झाला तर जिवावर बेतते. कित्येकदा गुन्हेगारीशी याचा संबंध असतो. हे सर्व मान्य केले तरी कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन पोलीस दलातील शीर्ष अधिकारी तरी कसे करणार?तेव्हा कुठे असतात वाहतूक पोलीस?शहरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. कोणताही सिग्नल असो तो तोडणारे वाहनचालक असतात. त्यातून अपघात होतात. परंतु बिटको सिग्नल, त्रिमूर्ती चौक, नागजी चौफुली, काठे गल्ली सिग्नल, मेहेर सिग्नल अशा अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना नेमके पोलीस नसतात; परंतु एखाद्या मार्गावर मात्र दबा धरून बसलेले पोलीस सहज अवतीर्ण होतात, हादेखील नागरिकांच्या दृष्टीने आश्चर्याचा भाग ठरला आहे.