शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

रस्त्यावरील अडवणूक : नियम पालनापेक्षा वसुलीवर अधिक भर टार्गेट वसुलीसाठी सामान्य नागरिक ‘टार्गेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:10 IST

वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही.

ठळक मुद्दे सर्वसामान्य नागरिकच अडचणीत हवालदारानेच तक्रार केल्याचा विषय गाजला कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन

नाशिक : वाहतूक शाखेला कारवाईचे दिलेले उद्दिष्ट आणि त्याच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या सापळ्यात सर्वसामान्य नागरिक सहज सापडतात. सहजगत्या म्हणून कोठे निघाले आणि या फेºयात अडकले की सुटका होत नाही. साहजिक नियम पालनापेक्षा अधिक भर वसुलीवर असल्याने पोलिसांचे कर्तव्यपालन नागरिकांना मात्र जाच ठरत आहे.शहरात वाढलेली वाहनांची संख्या आणि त्यातच अपुºया भौतिक सुविधा यामुळे समस्या जटिल होत चालली आहे. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया प्रवृत्ती असतात परंतु त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकच अडचणीत आणले जातात. मुळात वाहतूक पोलिसांना नियुक्त करताना कोणते निकष लावले जातात हे जणू उघड गुपित आहे. मुंबईच्या एका हवालदारानेच याबाबत तक्रार केल्याचा विषय राज्यभरात गाजला होता. परंतु अशा टार्गेटपूर्तीसाठी सर्वसामान्य वेठीस धरले जातात. अनेक ठिकाणी तर भल्या सकाळी दिवसभराचे टार्गेट वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातात. एकदा केसेसची शासकीय उद्दिष्टपूर्ती झाली की पुढे काय होते हे वेगळे विचारण्याची गरज नाही. पोलिसांच्या या वसुलीची महाराष्टÑाबाहेरही चर्चा पसरली आहे. त्र्यंबकरोडला जाताना येणाºया अडचणी हे अनेक देशांतील वाहतूक व्यावसायिकांना मनस्ताप देणारे ठरले आहे. एकदा तर अकारण वसुलीचा प्रयत्न झाल्यानंतर परराज्यातील भाविकांनी रस्त्यावरच ठाण मांडून पोलीस यंत्रणेची लक्तरे वेशीवर मांडली होती.अलीकडे तर मोहिमा अगोदरच सोशल मीडियावरून व्हायरल होतात आणि त्यानंतर पोलिसांच्या जाचापासून सुटका करण्यासाठी नागरिकांना मार्ग बदल करावे लागतात. सुरक्षिततेची काळजी प्रत्येकाला असते आणि त्यात कसूर झाला तर जिवावर बेतते. कित्येकदा गुन्हेगारीशी याचा संबंध असतो. हे सर्व मान्य केले तरी कायद्यापलीकडील वसुलीचे समर्थन पोलीस दलातील शीर्ष अधिकारी तरी कसे करणार?तेव्हा कुठे असतात वाहतूक पोलीस?शहरात अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक वाहतूक नियमांचे उल्लंघन होते. कोणताही सिग्नल असो तो तोडणारे वाहनचालक असतात. त्यातून अपघात होतात. परंतु बिटको सिग्नल, त्रिमूर्ती चौक, नागजी चौफुली, काठे गल्ली सिग्नल, मेहेर सिग्नल अशा अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असताना नेमके पोलीस नसतात; परंतु एखाद्या मार्गावर मात्र दबा धरून बसलेले पोलीस सहज अवतीर्ण होतात, हादेखील नागरिकांच्या दृष्टीने आश्चर्याचा भाग ठरला आहे.