शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शेतकरी कृषी पर्यटनाच्या वाटेवर‘

By admin | Updated: December 26, 2016 02:25 IST

एमटीडीसी’चे प्रोत्साहन : समृद्ध हवामान, निसर्गसौंदर्यामुळे मिळतो वाव

अझहर शेख नाशिकनाशिक जिल्हा हा कृषी क्षेत्रात अधिक प्रगत जिल्हा म्हणून ओळखला जातो. याबरोबरच डोेंगररांगा, धरणे, वृक्षसंपदा आणि शेतीचा ग्रामीण बाज असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी वर्षभरात कृषी पर्यटनाच्या वाटेवर स्वार झाले आहे. कृषी पर्यटनाला नैसर्गिकदृष्ट्या असलेला वाव आणि नागरिकांना पर्यटनाची पडणारी भुरळ लक्षात घेत कृषी पर्यटन विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून शेतकऱ्यांना विविध योजनांतर्गत प्रोत्साहन दिले जात आहे. द्राक्षे, कांदा, मका, ऊस या प्रमुख पिकांचे उत्पादनासाठी नाशिक प्रसिद्ध आहे. द्राक्षमळ्यांमुळे वायनरी उद्योग व्यावसायिकांनाही नाशिकने आकर्षित केले आहे. यामुळे वाइन पर्यटनालाही चालना मिळत आहे. याबरोबरच जिल्ह्यात कृषी पर्यटनही विकसित होताना दिसत आहे. कृषी पर्यटनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळही प्रयत्नशील असून, जे शेतकरी पर्यटनाची आवड ठेवतात त्यांना मार्गदर्शन करून ‘महाभ्रमण’, निवास - न्याहारी’ योजनांद्वारे कृषी पर्यटनासाठी प्रोत्साहित करत आहे. यासाठी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांकडे असलेली प्रकल्पासाठी जागा, ठिकाण, भांडवल आणि संकल्पना आदि विषयींची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.