शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:14 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमहादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी (दि.४) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव खोºयातील सर्वच छोटे-मोठे नदी-नाले दुपारपासून ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडत असलेल्या संततधार पावसाने व पहाटेपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे नायगाव खोºयातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.गत चार वर्षांनंतर नायगाव खोºयातील नद्या रविवारच्या कोसळधार पावसामुळे वाहत्या झाल्या आहेत. पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे शेतात असलेले खरिपातील कोबी, टमाटे, मिरची, मका, मेथी, कोथिंबीर, शेपू, मेथी आदी भाजीपाल्यासह पेरणी केलेले सोयाबीन , भुईमूग, बाजरी आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेआहे.दरम्यान, गोदावरी व दारणेला आलेल्या महापुराचे पाणी जोगलटेंभी येथील संगमावर एकत्र आल्याने महादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे. जोगलटेंभी येथील उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील व लक्ष्मण भास्कर यांनी दिली. याच दोन्ही नद्यांचे पाणी निफाड तालुक्यातील सावळी गावाजवळील नायगाव -सायखेडा रस्त्यावर आल्याने हा रस्ता शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.पूर पाहण्यासाठी गर्दीगेल्या अनेक वर्षांनंतर रविवारी नायगाव खोºयातील नद्या पावसामुळे ओसंडून वाहत्या झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी अनेक दिवसांनी परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.