शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

नायगाव खोऱ्यातील नदी-नाले प्रवाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:14 IST

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देमहादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे.

नायगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारी झालेल्या पावसामुळे नायगाव खोºयातील सर्व नदी-नाले प्रवाहित झाले आहेत. नायगाव- सायखेडा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. शेतात पाणी साचल्याने हजारो एकर क्षेत्रातील भाजीपाला पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी (दि.४) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे नायगाव खोºयातील सर्वच छोटे-मोठे नदी-नाले दुपारपासून ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या सततच्या पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दररोज पडत असलेल्या संततधार पावसाने व पहाटेपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे नायगाव खोºयातील सर्वच नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. गेल्या चार वर्षांनंतर पहिल्यांदाच परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.गत चार वर्षांनंतर नायगाव खोºयातील नद्या रविवारच्या कोसळधार पावसामुळे वाहत्या झाल्या आहेत. पडत असलेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे शेतात असलेले खरिपातील कोबी, टमाटे, मिरची, मका, मेथी, कोथिंबीर, शेपू, मेथी आदी भाजीपाल्यासह पेरणी केलेले सोयाबीन , भुईमूग, बाजरी आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेआहे.दरम्यान, गोदावरी व दारणेला आलेल्या महापुराचे पाणी जोगलटेंभी येथील संगमावर एकत्र आल्याने महादेवाचे मंदिर पुराच्या पाण्याने वेढले आहे. जोगलटेंभी येथील उसाचे क्षेत्र पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाल्याची माहिती सरपंच शशिकांत पाटील व लक्ष्मण भास्कर यांनी दिली. याच दोन्ही नद्यांचे पाणी निफाड तालुक्यातील सावळी गावाजवळील नायगाव -सायखेडा रस्त्यावर आल्याने हा रस्ता शनिवारी रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.पूर पाहण्यासाठी गर्दीगेल्या अनेक वर्षांनंतर रविवारी नायगाव खोºयातील नद्या पावसामुळे ओसंडून वाहत्या झाल्या आहेत. पंधरा दिवसांपासून पडणाºया पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले असले तरी अनेक दिवसांनी परिसरातील सर्व बंधारे तुडुंब भरून नद्यांना आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.