शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

नदीकाठची शेती गेली वाहून

By admin | Updated: August 4, 2016 01:23 IST

मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतात झाले पाण्याचे तळे

 नाशिकरोड : दारणा नदीला आलेला पूर व पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या गावातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाची श्रावण पाळ सुरू राहाणार असल्याने दुबार पेरणी करता येणे शक्य नसुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाचे आगमन झाले. तसेच धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी, वालदेवी, दारणा या नद्यांना महापूर आला होता. यामुळे सर्वत्र शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. तर नदीकाठच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पीक पेरणी वाहुन गेली.नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या भगूर, लहवित, दोनवाडे, नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, वडनेर, विहितगांव, चेहेडी, पळसे, जाखोरी या गावातील मळे विभागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडून गेली आहेत. सर्वात जास्त नुकसान सोयाबीन व भाजीपाल्याच्या शेतीचे झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोथींबीर, शेपु, मेथी, मुळे या शेती मालाचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. नवीन उसाच्या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे. बुधवारी शेतकरी व त्यांचे कुटुंबिय शेतात साचलेले पाणी मार्गस्थ करण्यासाठी दिवसभर राबत होते. आता पावसाची श्रावण पाळ सुरू होणार असल्याने दुबार पेरणी करणे देखील शक्य होणार नाही. शेती मालाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)