शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

नदीकाठची शेती गेली वाहून

By admin | Updated: August 4, 2016 01:23 IST

मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतात झाले पाण्याचे तळे

 नाशिकरोड : दारणा नदीला आलेला पूर व पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या गावातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाची श्रावण पाळ सुरू राहाणार असल्याने दुबार पेरणी करता येणे शक्य नसुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाचे आगमन झाले. तसेच धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी, वालदेवी, दारणा या नद्यांना महापूर आला होता. यामुळे सर्वत्र शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. तर नदीकाठच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पीक पेरणी वाहुन गेली.नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या भगूर, लहवित, दोनवाडे, नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, वडनेर, विहितगांव, चेहेडी, पळसे, जाखोरी या गावातील मळे विभागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडून गेली आहेत. सर्वात जास्त नुकसान सोयाबीन व भाजीपाल्याच्या शेतीचे झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोथींबीर, शेपु, मेथी, मुळे या शेती मालाचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. नवीन उसाच्या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे. बुधवारी शेतकरी व त्यांचे कुटुंबिय शेतात साचलेले पाणी मार्गस्थ करण्यासाठी दिवसभर राबत होते. आता पावसाची श्रावण पाळ सुरू होणार असल्याने दुबार पेरणी करणे देखील शक्य होणार नाही. शेती मालाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)