शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
5
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
6
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
7
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
8
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची मानसिक अवस्था बिघडली, रस्त्यावर भयानक अवस्थेत सापडली
9
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
10
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
11
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
12
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
13
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
14
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
15
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
16
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
17
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
18
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
19
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
20
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?

नदीकाठची शेती गेली वाहून

By admin | Updated: August 4, 2016 01:23 IST

मोठ्या प्रमाणात नुकसान : शेतात झाले पाण्याचे तळे

 नाशिकरोड : दारणा नदीला आलेला पूर व पावसाचे पाणी शेतात मोठ्या प्रमाणात साचल्याने नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या गावातील शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता पावसाची श्रावण पाळ सुरू राहाणार असल्याने दुबार पेरणी करता येणे शक्य नसुन शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.शहर व आजुबाजूच्या ग्रामीण भागात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी दिवसभर मुसळधार पावसाचे आगमन झाले. तसेच धरण परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी, वालदेवी, दारणा या नद्यांना महापूर आला होता. यामुळे सर्वत्र शेतात पावसाच्या पाण्याचे तळे साचले होते. तर नदीकाठच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने पीक पेरणी वाहुन गेली.नाशिक तालुक्याच्या पूर्व व आजुबाजुच्या भगूर, लहवित, दोनवाडे, नानेगाव, संसरी, बेलतगव्हाण, वडनेर, विहितगांव, चेहेडी, पळसे, जाखोरी या गावातील मळे विभागात शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पिके सडून गेली आहेत. सर्वात जास्त नुकसान सोयाबीन व भाजीपाल्याच्या शेतीचे झाले आहे. कांद्याच्या चाळीत पाणी शिरल्याने कांद्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोथींबीर, शेपु, मेथी, मुळे या शेती मालाचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. नवीन उसाच्या लागवडीचे देखील नुकसान झाले आहे. बुधवारी शेतकरी व त्यांचे कुटुंबिय शेतात साचलेले पाणी मार्गस्थ करण्यासाठी दिवसभर राबत होते. आता पावसाची श्रावण पाळ सुरू होणार असल्याने दुबार पेरणी करणे देखील शक्य होणार नाही. शेती मालाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (प्रतिनिधी)