शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रुग्णालयात रु ग्णांची हेळसांड

By admin | Updated: August 31, 2016 22:11 IST

ग्रामीण रुग्णालयात रु ग्णांची हेळसांड

येवला : येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.राज्य सरकार, केंद्र सरकार आरोग्यसेवेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र कर्मचाऱ्यांअभावी आरोग्यसेवेचा लाभ गरजवंतांना मिळत नसेल, वेळेवर रु ग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसतील तर या सुविधेचा उपयोग काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. येवला शहरातील ग्रामीण $$्निरुग्णालयात बुधवारी ६०० बाह्यरु ग्ण विभागात बसून होते. ग्रामीण ्नरुग्णालयात कार्यरत असलेले नगरपालिका प्रशासनाचे काही कर्मचाऱ्याची नगरपालिका कार्यालयात बदली झाल्याने आरोग्यसेवेची मुख्य जबाबदारी सांभाळणारे हे तीन कर्मचारी आता पालिकेत कारकुनाचे काम करणार आहेत. या रुग्णालयात डॉक्टरसह १० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून, मोठ्या प्रमाणावर बाह्यरुग्ण येत असताना उपजिल्हा रुग्णालयापेक्षाही अधिकचे काम येथे रोजच आहे. परंतु ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्राएवढादेखील स्टाफ या रुग्णालयात नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे. मोठे घर आणि पोकळ वासा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. आॅगस्ट महिन्यात ११ हजार बाह्यरुग्णांनी येथे उपचार घेतल्याची नोंद दवाखान्याच्या दप्तरी आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकानी किमान पुरेसे कर्मचारी येवला ग्रामीण रुग्णालयाला द्यावे, अशी सातत्याने मागणी होत आहे. तरीही कर्मचारी वर्ग मिळत नसल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. केवळ उपलब्ध असलेल्या एका डॉक्टरला एवढ्या मोठ्या रुग्णांचा आवाका क्षमतेपलीकडे जात आहे. तरी शासनाने याची त्वरित दखल घेत कर्मचारी भरती करावी. (वार्ताहर)