शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

ओव्हरहेड वाहिन्यांचा धोका कायम

By admin | Updated: June 27, 2017 00:34 IST

नाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नागपूरमध्ये ओव्हरहेड उच्चदाब वाहिनीच्या धक्क्यामुळे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन बालकांना जीव गमवावा लागला, तर या घटनांना महावितरणला जबाबदार धरत अभियंत्यांवर कारवाईदेखील करण्यात आली. या घटनेमुळे ओव्हरहेड वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारचा धोका असून, सिडकोसह शहरातील झोपडपट्टी आणि गावठाण भागात ओव्हरहेड वाहिन्या अजूनही मृत्यूच्या सापळा बनून आहेत. परिमंडळात ओव्हरहेड वाहिन्यांमुळे केवळ तीन महिन्यांत तब्बल आठ जणांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील ओव्हरहेड वाहिन्या भूमिगत कराव्यात यासाठी महावितरणला पायाभूत विकास आराखड्यातून कोट्यवधींचा निधी प्राप्त झालेला आहे. केवळ याच माध्यमातून नव्हे तर अन्य दोन योजनांमधून महावितरणने भूमिगत वाहिन्यांचे काम सुरू केले आहे. परंतु सदर कामांचे कंत्राट खासगी व्यक्तींना देण्यात आल्यामुळे या कामांना अपेक्षित गती प्राप्त झाली नसल्याचे दिसून येते. गेल्या पाच वर्षांत अपेक्षित कामे झाली नसल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना कागदोपत्री मात्र कामे प्रगतीवर दाखविली जात आहेत. पायाभूत विकास सुधारणा आराखडा अंतर्गत ५३५ कोटी खर्चाच्या योजनेतून २१९ किलोमीटरची वाहिनी भूमिगत करण्यात आली असून, याच योजनेतील दुसऱ्या टप्प्यात ३२५.६ किलोमीटरपैकी ३१६ किलोमीटर वाहिन्या भूमिगत करण्याचे काम पूर्ण झाल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. गतिमान विद्युत विकास सुधारणा कार्यक्रमांतर्गत ३० किलोमीटर केबल भूमिगत करण्यापैकी केवळ अर्धा किलोमीटरचे काम बाकी असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे. दुसऱ्या टप्प्यातील ५०.५ किलोमीटरपैकी फक्त २४ किलोमीटर भूमिगत केबलचे काम पूर्ण झाले आहे.  याशिवाय पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना तसेच एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्प (आयपीडीएस) या दोन योजनांमधूनही केबल भूमिगत करण्याचे काम प्रस्तावित आहे. यातील काही कामाचे कार्यारंभ आदेशही निघाले आहेत. याचाच अर्थ अजूनही वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाला अपेक्षित गती प्राप्त झालेली नाही.