शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

मेनरोड भागात पुन्हा वाढली वर्दळ, वाहनांच्या गर्दीत चालायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST

कोरोना निर्बंध शिथिल आता सारे काही सुरळीत होत असताना त्याच त्या समस्या पुन्हा पुढे येत असून त्यामुळे नागरी समस्यांमुळे ...

कोरोना निर्बंध शिथिल

आता सारे काही सुरळीत होत असताना त्याच त्या समस्या पुन्हा पुढे येत असून त्यामुळे नागरी समस्यांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ मेनरोडवर आहे. परंतु त्या ठिकाणी वाहतूक आणि गर्दीचे कोणतेही नियोजन झालेले नाही. सुतळीच्या तोड्यापासून सारे काही या बाजारपेठेत मिळत असल्याने शहरातीलच नागरिक नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिक या ठिकाणी येत असतात. मात्र, अरुंद रस्ता त्यातच फेरीवाल्यांची प्रचंड अतिक्रमणे यामुळे नागरिकांना चालणे कठीण झाले आहे. त्यातच या मार्गावर एक दुचाकी, रिक्षा किंवा अगदी कार जरी आली तर संपूर्ण भागात वाहतूक कोंडी होत असते. परिणामी, नागरिकांना चालण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

इन्फो...

लाखो लोकांची रोज ये-जा..

नाशिक शहराचीच नव्हे तर जिल्ह्याची ही मोठी मार्केट प्लेस आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक तर येथे येतातच परंतु त्याचबरोबर जिल्ह्यातील नागरिक या ठिकाणी ये-जा करतात. लाखो लोक या मार्गावर आणि मध्यवर्ती बाजारपेठेत ये-जा करीत असतात. त्यामुळे हा भाग मध्यवर्ती असूनही कोणतेही नियोजन नाही.

इन्फो..

फुटपाथ कागदावरच

मेनरोडचा रस्ता मुळातच विकास आराखड्यात रुंद दर्शवण्यात आला आहे. मात्र, दुतर्फा जुन्या वाड्यातील बाजारपेठ असल्याने तेथे रुंदीकरण करणे शक्य नाही. परिणामी पादचाऱ्यांच्या सेायीसाठी फुटपाथ बांधण्याचे नियोजन असले तरी ते कागदावरच आहे.

इन्फो...

अतिक्रमण हटाव केवळ नावालाच

महापालिकेने फेरीवाला झोन तयार केले आहेत. मात्र मेनरोडवरील फेरीवाले हे मुळातच राजकीय नेत्यांशी संबंधित असून त्यामागे मोठे अर्थकारण असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे फेरीवाल्यांना हटवण्याची महापालिकेची हिम्मत होत नाही.

कोट...१

मेनरोडही खूप महत्त्वाची बाजारपेठ आहे. मात्र, येथील गर्दीचे कोणतेही नियोजन नाही. प्रचंड अतिक्रमणे आणि नंतर वाहनांना बंदी नसल्याने एखादी गाडी मध्ये आलीच तर चालणे कठीण होते. गाडगे महाराज चौक, धुमाळ चौक येथे तर नेहमीच वाहतूक कोंडी असते.

- राजू कुटे, डिंगरअळी

कोट..२

बाजारपेठेत प्रवेश करतानाच इतक्या अडचणी असतात की, नाशिककरांना मध्यवर्ती भागात चालणे कठीण होते. पादचाऱ्यांना सहज चालता यावे यासाठी आधी अतिक्रमणे हटवली पाहिजेत. त्यानंतर मोठ्या वाहनांना ंबंदी घातली पाहिजे.

- कल्याणी कुलकर्णी, गंगापूर रोड

कोट...

महापालिकेच्या वतीने बाजारपेठेतील फेरीवाल्यांची अतिक्रमणे वेळावेळी हटवली जातात. सध्या कोरोनाचे निर्बंध शिथिल होत असल्याने गर्दी कमी वाढू लागली आहे. परंतु त्यावर नियोजन सुरू आहे.

- जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी, पश्चिम नाशिक