शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

टॅँकर घोषित करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:22 IST

नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले असून, भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी आपल्या अधिकारात टॅँकर मंजूर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबरपासून टंचाई कृती ...

ठळक मुद्देकृती आराखडा लालफितीत : टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले असून, भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी आपल्या अधिकारात टॅँकर मंजूर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबरपासून टंचाई कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश असतानाही जिल्हा परिषदेने अद्यापही अहवाल तयार केलेला नसल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास १० ते १२ टक्के यंदा पाऊस कमी पडला असून, सिन्नर, येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये ५० टक्केही पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात जून, जुलैपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावित असून, सप्टेंबरअखेर सुमारे दोनशेहून अधिक गावे, वाड्यांना ५८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा प्रशासनाने सप्टेंबरअखेर टॅँकर दवरे पाणीपुरवठा करण्याची मंजुरी दिली होती. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा किंवा काय विषयी संभ्रम होता. त्यावर आॅक्टोबरपासून टंचाई कृती कार्यक्रम लागू होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यापुढे टॅँकर मंजुरीचे अधिकार सर्व प्रांत अधिकाºयांना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी टंचाईग्रस्त गावांना टॅँकर मंजूर करावेत व तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आल्याने टंचाई भासणाºया गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत राहणार आहे. यंदाही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठा यंदा पावसाळ्यातच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक भासणार असून, अजूनही ग्रामीण भागातून टॅँकरची मागणी कायम आहे, असे असतानाही टंचाई कृती कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची सुरुवात आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात करणे गरजेचे असले तरी, जिल्हा परिषदेने अद्यापही टंचाई कृती आराखडा तयार केलेला नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला पत्र देऊन त्याचे स्मरण करून दिले आहे. कृती आराखडा तयार नसल्यामुळे यंदाही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.