शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

टॅँकर घोषित करण्याचे अधिकार प्रांताधिकाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 00:22 IST

नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले असून, भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी आपल्या अधिकारात टॅँकर मंजूर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबरपासून टंचाई कृती ...

ठळक मुद्देकृती आराखडा लालफितीत : टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक : आॅक्टोबर उजाडूनही जिल्ह्णातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप कायम असून, शासनाच्या टंचाई कृती कार्यक्रमानुसार यापुढे टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे अधिकार प्रांत अधिकाºयांना बहाल करण्यात आले असून, भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी आपल्या अधिकारात टॅँकर मंजूर करावेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आॅक्टोबरपासून टंचाई कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे शासनाचे आदेश असतानाही जिल्हा परिषदेने अद्यापही अहवाल तयार केलेला नसल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्ह्णात गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास १० ते १२ टक्के यंदा पाऊस कमी पडला असून, सिन्नर, येवला, नांदगाव, बागलाण, मालेगाव, चांदवड या तालुक्यांमध्ये ५० टक्केही पाऊस झालेला नाही. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात जून, जुलैपासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावित असून, सप्टेंबरअखेर सुमारे दोनशेहून अधिक गावे, वाड्यांना ५८ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जिल्हा प्रशासनाने सप्टेंबरअखेर टॅँकर दवरे पाणीपुरवठा करण्याची मंजुरी दिली होती. त्यामुळे १ आॅक्टोबरपासून टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा किंवा काय विषयी संभ्रम होता. त्यावर आॅक्टोबरपासून टंचाई कृती कार्यक्रम लागू होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने यापुढे टॅँकर मंजुरीचे अधिकार सर्व प्रांत अधिकाºयांना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. भूजल अधिनियमानुसार प्रांत अधिकाºयांनी टंचाईग्रस्त गावांना टॅँकर मंजूर करावेत व तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर करावा, असे निर्देशही देण्यात आल्याने टंचाई भासणाºया गावांचा पाणीपुरवठा पूर्ववत राहणार आहे. यंदाही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठा यंदा पावसाळ्यातच टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागल्याने उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक भासणार असून, अजूनही ग्रामीण भागातून टॅँकरची मागणी कायम आहे, असे असतानाही टंचाई कृती कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील कामांची सुरुवात आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात करणे गरजेचे असले तरी, जिल्हा परिषदेने अद्यापही टंचाई कृती आराखडा तयार केलेला नाही. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेला पत्र देऊन त्याचे स्मरण करून दिले आहे. कृती आराखडा तयार नसल्यामुळे यंदाही टॅँकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.