शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

बिनशेती परवानगीचे अधिकार आता तहसीलदारांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:20 IST

नाशिक : बिनशेती परवानगीचे काम जलदगतीने व्हावे यासाठी आता तहसीलदारांना अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे याकामी होणारी दिरंगाई कमी ...

नाशिक : बिनशेती परवानगीचे काम जलदगतीने व्हावे यासाठी आता तहसीलदारांना अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे याकामी होणारी दिरंगाई कमी होणार असून कामकाजालादेखील गती येणार आहे. यामुळे चलन भरून थेट बिनशेती वापर करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, बिनशेती परवानगी सुलभ व्हावी म्हणून शासनाने अनेक बदल कायद्यात केले. अतिजलद बिगरशेती परवानगी मिळावी या दृष्टीने जिल्ह्यात आता हे अधिकार तहसीलदार स्तरावर प्रदान करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणीसुद्धा कमीत कमी कागदपत्रांची आवश्यकता ठेवण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे स्वतःहून तहसीलदार असे गट शोधून त्या मालकांना नोटीस देऊन चलनाची प्रतसुद्धा देतील. जेणेकरून ज्यांना कुणाला बिगरशेती वापर सुरू करायचा आहे ते चलान भरून थेट वापर सुरू करू शकतील, अशा आशयाचे आदेश आज जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जारी केले आहेत.

अंमलबजावणीच्या दृष्टीने तहसीलदारांकडे जमिनींचे गट नंबर व सर्व्हे नंबर दर्शविणाऱ्या याद्या तहसीलदार यांच्याकडे उपलब्ध आहेत. या झोननिहाय प्राप्त सर्व्हे व गट नंबरनिहाय यादीची तलाठी यांच्यामार्फत तत्काळ सविस्तर चौकशी करण्यात यावी, या यादीतील पूर्वीचे जे गट व सर्व्हे नंबर अलहिदा अकृषिक झालेले आहेत, ते वगळून उर्वरित जमिनीच्या गट व सर्व्हे नंबरची यादी व्यक्तीनिहाय व क्षेत्रनिहाय तत्काळ तयार करावी. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा काढण्यात येऊ नयेत. त्यासाठी स्वतंत्र नियम व कार्यपध्दती ठरवून दिलेली आहे. यादी तयार करतांना ज्या जमिनी भोगवटदार वर्ग-२ आहेत, त्या जमिनीच्याबाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतली आहे किंवा नाही, प्रकरणी शासनाचा नजराणा भरलेला आहे किंवा नाही, याबाबत गाव नमुना नं. १ क व इनाम रजिस्टरवरूनदेखील शहानिशा करावी, असेही जिल्हाधिकारी मांढरे यांच्या आदेशात नमूद केले आहे.

या तरतुदीनुसार अंतिम विकास आराखडा, प्रादेशिक आराखड्यात रहिवास, वाणिज्य व औद्योगिक प्रयोजनासाठी राखीव असलेल्या परंतु बिनशेती न झालेल्या जमिनींना अकृषिक आकारणीचे आदेश लागू करण्यापुरते आहे. इतर बाबतीत शासनाचे प्रचलित आदेश लागू राहतील. संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी दर १५ दिवसांनी याबाबतीत स्वतः तपासणी करून आढावा घेऊन संबंधित तहसीलदार यांची कामे नियमाप्रमाणे कामकाज होत आहे किंवा कसे याबाबत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवावा असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी कळविले आहे.