शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

२० हजार क्विंटल रेशनचा तांदूळ व्यपगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:18 IST

अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.

नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.  जिल्ह्यातील २६०० रेशन दुकानांना जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या संख्येच्या प्रमाणात दर महिन्याला शासनाकडून गहू व तांदळाचा कोटा मंजूर करण्यात येतो, त्यासाठी अन्नधान्य महामंडळाकडून धान्य उपलब्ध करून दिले जाते. मे महिन्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या धान्याच्या नियतनात तांदळाचा संपूर्ण कोटा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मनमाडला अन्नधान्य महामंडळाची वॅगन आल्यावर त्यात तांदळाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या तांदळाचा पूर्ण कोटा मिळू शकलेला नाही. त्यामुळे नाशिक शहरातील रेशन दुकानदारांना सुमारे ११ हजार क्विंटल तांदूळ कमी वाटप करण्यात आला, तर ग्रामीण भागातील दुकानांसाठी ९ हजार क्विंटल तांदूळ मिळू शकलेला नाही. शासनाच्या वतीने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला २० किलो गहू व १५ किलो तांदूळ दरमहा वाटप करण्यात येतो.  पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नधान्य महामंडळाने पुरेसा तांदूळ पुरविला नसला तरी, जिल्ह्यातील बहुतांशी रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा तांदूळ मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिल्यामुळे त्याचे वाटप मे महिन्यात करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी जिल्ह्याचा व्यपगत झालेला २० हजार क्विंटल तांदूळ पूर्ववत मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय