शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

२० हजार क्विंटल रेशनचा तांदूळ व्यपगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:18 IST

अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.

नाशिक : अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यासाठी पुरवठा विभागाने पाठपुरावा सुरू केला आहे.  जिल्ह्यातील २६०० रेशन दुकानांना जोडण्यात आलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या संख्येच्या प्रमाणात दर महिन्याला शासनाकडून गहू व तांदळाचा कोटा मंजूर करण्यात येतो, त्यासाठी अन्नधान्य महामंडळाकडून धान्य उपलब्ध करून दिले जाते. मे महिन्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या धान्याच्या नियतनात तांदळाचा संपूर्ण कोटा दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी, प्रत्यक्षात मनमाडला अन्नधान्य महामंडळाची वॅगन आल्यावर त्यात तांदळाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी मंजूर करण्यात आलेल्या तांदळाचा पूर्ण कोटा मिळू शकलेला नाही. त्यामुळे नाशिक शहरातील रेशन दुकानदारांना सुमारे ११ हजार क्विंटल तांदूळ कमी वाटप करण्यात आला, तर ग्रामीण भागातील दुकानांसाठी ९ हजार क्विंटल तांदूळ मिळू शकलेला नाही. शासनाच्या वतीने प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला २० किलो गहू व १५ किलो तांदूळ दरमहा वाटप करण्यात येतो.  पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नधान्य महामंडळाने पुरेसा तांदूळ पुरविला नसला तरी, जिल्ह्यातील बहुतांशी रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा तांदूळ मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिल्यामुळे त्याचे वाटप मे महिन्यात करण्यात आले आहे. परंतु, असे असले तरी जिल्ह्याचा व्यपगत झालेला २० हजार क्विंटल तांदूळ पूर्ववत मिळावा यासाठी शासनदरबारी प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय