शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

सधन शेतकºयांच्या वीज सवलतीबाबत फेरविचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:09 IST

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत

नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, नाशिक जिल्ह्णासाठी ३३ केव्हीच्या ५९ उपकेंद्रांचे नियोजन आहे. नाशिक शहर विद्युतीकरणासाठी ५० कोटीचा निधी दिला जाणार आहे. वीजतारा भूमिगत करण्यासाठी नागपूरप्रमाणे नाशिक महानगरपालिकेने महासभेत ठराव केल्यास डॅमेज चार्जेस देत वीज वाहिन्या भूमिगत करून देऊ, असे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकच्या इंडिया बुल कंपनीशी सरकारचा करार झालेला नाही. कारण त्यांची वीज महाग पडणार आहे. उद्योजक, व्यापारी अशा कोणालाच ती परवडणारी नाही, असेही ते म्हणाले.बंद पडलेली डीपी दुरुस्त करण्यासाठी ने-आण करताना वाहतूक खर्च शासनाकडून दिला जातो; मात्र ग्रामीण भागात शेतकºयांना वर्गणी काढून डीपी दुरुस्तीसाठी ने-आण करावी लागते हे अत्यंत चुकीचे असून, त्याची चौकशी केली जाईल. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने विजेची कामे होत नाहीत. त्यामुळे आउटसोर्सिंग तत्त्वावर कर्मचारी नेमण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अ‍ॅव्हरेज बिल देणे चुकीचे असून, त्यामुळे महावितरणच्या अ‍ॅपला आगामी चार महिन्यात सर्व ग्राहकांना जोडले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.एकलहरे प्रकल्प रद्द नाहीएकलहरे येथील मंजूर ६६० मेगावॅटचा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलहरे येथील वीजनिर्मिती दर साडेपाच रुपये पडत आहे. लांबवरून कोळसा वाहतूक करून वीज निर्मिती करणे महाग पडत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती दर कमी कसा राहील, याचा विचार शासन करत आहे. साडेपाच रुपये दराची वीज ग्राहकांना परवडणारी नाही व ती स्वीकारली जाणार नाही. एकलहरेचा प्रकल्प रद्द केलेला नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.