शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

सधन शेतकºयांच्या वीज सवलतीबाबत फेरविचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:09 IST

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

रबावनकुळे : कंपनीचे २७ हजार कोटी थकीत

नाशिकरोड : महावितरण कंपनीचे वीजबिलापोटी २७ हजार कोटी रुपये थकीत असून, कंपनी सुरू ठेवण्यासाठी व ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी थकबाकी वसूल करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतकºयांना सवलतीच्या दरात १ रुपया दराने वीज दिली जाते. मात्र जे सधन शेतकरी, बागायतदार आहेत त्यांना सवलतीऐवजी नियमित दराने वीज देण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे म्हणाले, नाशिक जिल्ह्णासाठी ३३ केव्हीच्या ५९ उपकेंद्रांचे नियोजन आहे. नाशिक शहर विद्युतीकरणासाठी ५० कोटीचा निधी दिला जाणार आहे. वीजतारा भूमिगत करण्यासाठी नागपूरप्रमाणे नाशिक महानगरपालिकेने महासभेत ठराव केल्यास डॅमेज चार्जेस देत वीज वाहिन्या भूमिगत करून देऊ, असे बावनकुळे यांनी सांगितले. नाशिकच्या इंडिया बुल कंपनीशी सरकारचा करार झालेला नाही. कारण त्यांची वीज महाग पडणार आहे. उद्योजक, व्यापारी अशा कोणालाच ती परवडणारी नाही, असेही ते म्हणाले.बंद पडलेली डीपी दुरुस्त करण्यासाठी ने-आण करताना वाहतूक खर्च शासनाकडून दिला जातो; मात्र ग्रामीण भागात शेतकºयांना वर्गणी काढून डीपी दुरुस्तीसाठी ने-आण करावी लागते हे अत्यंत चुकीचे असून, त्याची चौकशी केली जाईल. कर्मचारी संख्या अपुरी असल्याने विजेची कामे होत नाहीत. त्यामुळे आउटसोर्सिंग तत्त्वावर कर्मचारी नेमण्याचे अधिकार अधीक्षक अभियंत्यांना दिले असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अ‍ॅव्हरेज बिल देणे चुकीचे असून, त्यामुळे महावितरणच्या अ‍ॅपला आगामी चार महिन्यात सर्व ग्राहकांना जोडले जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.एकलहरे प्रकल्प रद्द नाहीएकलहरे येथील मंजूर ६६० मेगावॅटचा प्रकल्प कधी सुरू होणार याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकलहरे येथील वीजनिर्मिती दर साडेपाच रुपये पडत आहे. लांबवरून कोळसा वाहतूक करून वीज निर्मिती करणे महाग पडत आहे. त्यामुळे वीजनिर्मिती दर कमी कसा राहील, याचा विचार शासन करत आहे. साडेपाच रुपये दराची वीज ग्राहकांना परवडणारी नाही व ती स्वीकारली जाणार नाही. एकलहरेचा प्रकल्प रद्द केलेला नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.