शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देमहानगरातील छोट्या उद्योगांना चांगली संधी

रामदास शिंदे ।पेठ : कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.नाशिक ते बलसाड महामार्गावर पेठ शहराच्या पश्चिमेस औद्योगिक वसाहतीसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, १९९०च्या सुमारास या ठिकाणी काही उद्योग सुरूही झाले होते. मात्र कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रस्ता, वीज व पाणी या महत्त्वांच्या गरजांची पूर्तता होऊ न शकल्यामुळे एकेक करून सर्व उद्योग बंद पडले. नंतरच्या काळात पेठ येथे शिराळे धरण तसेच गुजरात राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले असले तरी भूखंड आरक्षित असूनही उद्योजकांनी नव्याने कारखाने सुरू करण्याचे धाडस दाखवले नाही.सद्या कोरोनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, बलसाड, वापी, सेलवास, ठाणे, कल्याण येथील अनेक छोट्या उद्योजकांना परप्रांतीय स्थलांतरित कामगार गावी परतल्याने शिवाय सर्वच नियमांचे पालन करून उद्योग सुरू करणे अवघड होऊन बसले आहे. तर दुसरीकडे पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात स्थलांतरित झालेले शेतमजूर हाताला काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसले आहेत.

बेरोजगारीचा प्रश्न मिटेलपेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू केल्यास सर्वात महत्त्वाचे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील आणि वर्षानुवर्ष केवळ टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी उच्चशिक्षित तरुण द्राक्षबागेत काम करतात अशा तरुणांना संधी मिळेल. आदिवासी भागात शिक्षणाचा स्तर उंचावला असून, अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेऊन घरी बसले आहेत. महाराष्ट्र शासनात विधानसभा उपाध्यक्षपदी असलेले नरहरी झिरवाळ हे पेठ तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. किमान त्यांच्या या कार्यकाळात तरी पेठची औद्योगिक वसाहत कार्यान्वित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पेठ शहर हे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारे शहर असून, पेठची औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास दोन्ही राज्यांतून उद्योगधंदे येऊ शकतात. यामुळे स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न निकाली निघणार असून, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून यापुढील काळात पाठपुरावा करून उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.- गणेश गवळी, पेठ

टॅग्स :MIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय