शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

पेठ औद्योगिक वसाहतीला मिळावी नवसंजीवनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देमहानगरातील छोट्या उद्योगांना चांगली संधी

रामदास शिंदे ।पेठ : कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्यवसायिक यांना उत्पादनाची चांगली संधी निर्माण होणे शक्य झाले आहे.नाशिक ते बलसाड महामार्गावर पेठ शहराच्या पश्चिमेस औद्योगिक वसाहतीसाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, १९९०च्या सुमारास या ठिकाणी काही उद्योग सुरूही झाले होते. मात्र कोणत्याही उद्योगासाठी आवश्यक असलेल्या रस्ता, वीज व पाणी या महत्त्वांच्या गरजांची पूर्तता होऊ न शकल्यामुळे एकेक करून सर्व उद्योग बंद पडले. नंतरच्या काळात पेठ येथे शिराळे धरण तसेच गुजरात राष्ट्रीय महामार्गाच्या नूतनीकरणाचे कामही अंतिम टप्प्यात आले असले तरी भूखंड आरक्षित असूनही उद्योजकांनी नव्याने कारखाने सुरू करण्याचे धाडस दाखवले नाही.सद्या कोरोनामुळे मुंबई, पुणे, नाशिक, बलसाड, वापी, सेलवास, ठाणे, कल्याण येथील अनेक छोट्या उद्योजकांना परप्रांतीय स्थलांतरित कामगार गावी परतल्याने शिवाय सर्वच नियमांचे पालन करून उद्योग सुरू करणे अवघड होऊन बसले आहे. तर दुसरीकडे पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी तालुक्यात स्थलांतरित झालेले शेतमजूर हाताला काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसले आहेत.

बेरोजगारीचा प्रश्न मिटेलपेठ येथील औद्योगिक वसाहत सुरू केल्यास सर्वात महत्त्वाचे स्थानिकांना नोकऱ्या मिळतील आणि वर्षानुवर्ष केवळ टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी उच्चशिक्षित तरुण द्राक्षबागेत काम करतात अशा तरुणांना संधी मिळेल. आदिवासी भागात शिक्षणाचा स्तर उंचावला असून, अनेक विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेऊन घरी बसले आहेत. महाराष्ट्र शासनात विधानसभा उपाध्यक्षपदी असलेले नरहरी झिरवाळ हे पेठ तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. किमान त्यांच्या या कार्यकाळात तरी पेठची औद्योगिक वसाहत कार्यान्वित व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पेठ शहर हे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारे शहर असून, पेठची औद्योगिक वसाहत सुरू झाल्यास दोन्ही राज्यांतून उद्योगधंदे येऊ शकतात. यामुळे स्थानिक बेरोजगारांचा प्रश्न निकाली निघणार असून, लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालून यापुढील काळात पाठपुरावा करून उद्योजकांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.- गणेश गवळी, पेठ

टॅग्स :MIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय