शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सुधारित मूल्यांकनाचा प्रस्ताव : १ एप्रिल २०१७ नंतरच्या मिळकतींचा समावेश नवीन मिळकतींची घरपट्टी वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:43 IST

महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

नाशिक : महापालिकेने दि. १ एप्रिल २०१७ नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या अथवा येणाºया मिळकतींच्या करांचे मूल्यांकनाचे वाजवी भाडे सुधारित करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, येत्या महासभेत तो मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास नव्याने अस्तित्वात येणाºया मिळकतींच्या घरपट्टींमध्ये त्या-त्या भागातील रेडीरेकनरनुसार वाढ होऊन महापालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.नाशिक महापालिकेने कर योग्य मूल्याचे दर सन १९९९-२००० मध्ये सुधारित केले होते. त्यानंतर अद्याप १७ वर्षांत मूल्यांकनाचे दर सुधारित करण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्टÑ शासनाच्या प्रधान महालेखाकारांनी वेळोवेळी आक्षेप नोंदविलेले आहेत. केंद्र सरकार प्रतिवार्षिक महागाई निर्देशांक निश्चित करत असतात. त्यानुसार, सन १९९९-२००० मध्ये महागाई निर्देशांक ३८९ रुपये होता. तर आता सन २०१६-१७ मध्ये तो ११२५ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामध्ये सुमारे २८९.२० टक्के इतकी वाढ झालेली आहे. महाराष्टÑ शासनाच्या रेडी रेकनरचा सन १९९९ मधील नाशिक महापालिका हद्दीतील मिळकती व जमिनीचा किमान दर हा ५२२० रुपये होता तर सन २०१७-१८ मध्ये तो किमान २२,२०० रुपये झालेला आहे. यामध्ये सुमारे ४२५.२८ टक्के इतकी वाढ झालेली आहे. याप्रमाणे जर महापालिकेने विचार केल्यास मूल्यांकनाचे वाजवी भाड्याचे आरसीसी, निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौ.फुटास ०.५० आहे. त्यामध्ये ४२५.२८ टक्के वाढ केल्यास त्याचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रति चौ.फुटास दर २.१२ रुपये इतकी वाढ होणे अपेक्षित आहे. तसेच आरसीसी, बिगर निवासी मालमत्तेचा कमाल दर प्रति चौ.फुटास १.८० रुपये असून, त्यामध्ये ४२५.२८ टक्के वाढ केल्यास त्याचा सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात प्रति चौ. फुटास दर ७.६५ रुपये इतका होणे अपेक्षित आहे.जुन्या मिळकतींत बदल नाहीअधिनियमातील तरतुदीनुसार ज्या मिळकतींचे मूल्यांकन निश्चित करण्यात आलेले आहे. परंतु, ज्या मिळकतींमध्ये (वापरात बदल, वाढीव बांधकाम, भाडेकरू, बांधकामात बदल) कोणताही बदल केलेला नाही. अशा मिळकतींच्या मूल्यांकनामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे दि. ३१ मार्च २०१७ पूर्वीच्या अस्तित्वात असलेल्या मिळकतींच्या मूल्यांकनात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्तांनी प्रस्तावात स्पष्ट केले आहे. सदर मूल्यांकनाचे दर निश्चित करण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याचेही प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.