लासलगाव : लासलगाव - विंचूरसह १६ गाव पाणी योजनेचे पाण्याचे व दुसऱ्यांदा पाणी पपिंग करण्यासाठीचे विजेची देयके शासनाच्या अनुदानातून अदा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लासलगाव येथे झालेल्या आढाव बैठकीत दिली.माजी सरपंच सुमतीलाल आबड यांनी आढावा बैठकीचे प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच नानासाहेब पाटील, लासलगाव बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर, निफाडचे प्रांत डॉ. शशीकांत मंगरुळे, हरिश्चंद्र भवर यांच्यासह बाजार समितीच्या संचालकांसमवेत आढावा बैठकीत चर्चा झाली. याचवेळी लासलगाव परिसरातील ४२ गावातील लोकप्रतिनिधी व नागरिकांशी लासलगाव बाजार समिती सभागृहात चर्चा करून संवाद साधला. यावेळी नागरिकांनी विविध समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यानंतर पाटबंधारे व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रलंबित पाणीप्रश्नाबाबत चर्चा झाली. यावेळी जयदत्त होळकर, जगदीश होळकर, सौ. सुवर्णा जगताप, गुणवंत होळकर, अरुण थोरात, पप्पू कहाणे, नीलेश लचके, नीलेश पटणी, मधुकर गावडे, दिनेश जाधव उपस्थित होते. (वार्ताहर)
लासलगाव येथे आढावा बैठक
By admin | Updated: July 28, 2014 00:53 IST