शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

धरणावर जीवन प्राधिकरणाची आढावा बैठक

By admin | Updated: June 27, 2014 00:17 IST

धरणावर जीवन प्राधिकरणाची आढावा बैठक

 

मालेगाव : तालुक्यातील लुल्ले धरण कार्यस्थळावर जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन मंडळ अधिकारी सुदर्शन कालिके यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी माळमाथ्यावरील २५ गावांसाठी नव्याने मंजूर करण्यात आलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याची सूचना आमदार दादा भुसे यांनी केली.आॅक्टोबर २०१२ मध्ये या योजनेच्या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. गेल्या मार्च महिन्यात योजना पूर्णत्वास येणे अपेक्षित असताना अद्याप योजनेची कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे माळमाथ्यावरील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. या पार्श्वभूमीवर भुसे यांनी तातडीने योजनेच्या कामांचा आढावा सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. उपअभियंता मोरे यांनी प्राथमिक माहिती दिली. करंजगव्हाण, हाताणे, टोकडे, जळकू जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. करंजगव्हाणला दोन्ही जलकुंभाचा वापर केला जात आहे. याच बरोबर झालेली कामे व अपूर्ण कामे या विषयी त्यांनी चर्चा केली. जलशुद्धीकरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वीत झाल्यानंतर या गावांना शुद्ध पाणीपुरवठा केला जाईल. त्यामुळे काही गावांनी स्थानिक पाणीपुरवठा योजनांना प्राधान्य दिल्याने जोडणी घेतली नसेल तरी जलकुंभ व वितरण प्रणाली अद्यावत ठेवा, अशा सूचना भुसे यांनी केली.लुल्ले, डोंगराळे, गरबड, विराणे, जळकू, कंधाणे येथे पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या. जीवन प्राधिकरणने तातडीने विद्युत जनित्राचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवावा व मंजूर करुन घ्यावा. वीज नसली तरी जलशुद्धीकरण व पाणी वितरण यंत्रणेत खंड पडू नये, अशा सूचना केल्या. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण होणे अपेक्षित आहे. (वार्ताहर)नाही, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना मोठ्या मुश्किलीने योजनेला मंजुरी मिळविली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात काम पूर्ण करा, अशा सूचना आमदार भुसे यांनी केल्या. त्याचप्रमाणे फिल्ट्रेशन प्लाँटचे कामदेखील ७० टक्के पूर्ण झाले असून, लवकरच शुद्ध व मुबलक पाणी योजनेत समाविष्ट असलेल्या २५ गावांना देण्यात येईल.बैठकीस अधीक्षक अभियंता कालिके, कार्यकारी अभियंता मोरे, उपअभियंता सोनवणे, शाखा अभियंता खरे, वाघ, मोहिद्दीन आदि अधिकारी उपस्थित होते. चर्चेत पंचायत समिती सदस्य अण्णा पवार, दिनकर चव्हाण, कृष्णा चव्हाण, बंटी चव्हाणू, विजू चव्हाण, दीपक चव्हाण, बन्सीलाल चव्हाण, रामचंद्र मिसाळ, संजय बोरसे, रवींद्र चव्हाण, समाधान ठोंबरे, डिगा परदेशी, मनोहर ठाकरे, संजय ह्याळीज, राजेंद्र पाटील, मनोहर ह्याळीज, समाधान खैरनार, बन्सीलाल कचवे, भाऊसाहेब भामरे, चैत्राम गर्दे, धनराज पवार, गंगाराम गर्दे, शंकुष थोरकर, प्रवीण इंगळे, अंतू देवरे आदिंनी सहभाग घेतला.