शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहतींसाठी आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 00:43 IST

मालेगाव : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. याबाबत शासन सकारात्मक असून, यातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.

ठळक मुद्देदादा भुसे : तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

मालेगाव : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. याबाबत शासन सकारात्मक असून, यातून स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत.तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन तसेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अजंग - रावळगाव औद्योगिक वसाहतीचे इंटिग्रेटेड टेक्सटाइल हब या योजनेत समावेश करून उद्योजकांसाठी कामगार वसाहत, दवाखाना, शाळा, फळे व भाज्या प्रक्रि या प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन, पाणीपुरवठा व इतर बाबींसाठी जागा राखून ठेवण्यात यावी. समांतर भूखंडाची प्रक्रिया सुरू करून स्थानिकांना तसेच महिला उद्योजक, अपंग, बचतगट, शेतकरी यांना प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर गिरणा धरणावरून चाळीसगाव फाटा येथे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात यावी. तसेच निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळेत उद्योग सुरू करण्याºया उद्योजकांना अतिरिक्त सवलत देण्यात यावी, असे प्रस्ताव ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांनी सादर केले. या उद्योगांसाठी आवश्यक वीज व पाणी याबाबत माहिती स्थानिक लोकांनी उपलब्ध करून दिली असल्याचेही भुसे यांनी सांगितले.औद्योगिक वसाहतीबाबत लवकरच निर्णयउद्योगमंत्री देसाई म्हणाले, लघुउद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशिअल इंटलिजन्स-सारख्या तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ कमी लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून लघुउद्योगांना चालना देणे आवश्यक असून, अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतींबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.