शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

आदिवासींच्या समस्यांबाबत आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 16:18 IST

येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला. अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देस्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत.

पिंपळगाव बसवंत : येथे आदिवासी शक्ती सेनेची आढावा बैठक झाली. सदर बैठकीत आदिवासी शक्ती सेनेच्या शाखा समस्यांचा पाढा वाचण्यात आला.अतिक्रमित जागा नियमित करण्यासाठी विषय मांडण्यात आले. पाणी, रस्ते, घरकुल, शौचालय, रेशनकार्ड, जातीचा दाखला अशा विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. भविष्यातील ध्येय धोरणांचा आराखडा बैठकीत तयार करण्यात आला. सदर मागण्या घेऊन आदिवासी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पिंपळगाव बसवंत येथे प्रभाकर फसाळे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आदिवासी शक्ती सेना यांच्या विशेष उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्ष संदीप गांगुर्डे होते. यावेळी चांदवड तालुका अध्यक्ष बळीराम वाघ, निफाड तालुका विभागप्रमुख सचिन जाधव, निफाड तालुका युवा संपर्कप्रमुख श्रावण कोटील, मुखेड अध्यक्ष परशराम सूर्यवंशी, शरद गायकवाड, नांदुर्डी विभागप्रमुख कैलास सूर्यवंशी, पिंपळगाव संपर्कप्रमुख जितू वाघ, कार्याध्यक्ष गणेश गायकवाड, तुळशीराम गुंबाडे, योगेश गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, सुनील वाघ, रवींद्र पवार, शशिकांत गांगुर्डे, रणजित पाडे, अंकुश वाघ, चेतन डंबाळे, वसंत वाघ, चेतन चतुर, तुषार वाघ, केशव लोखंडे, रमेश खभोरे, संतोष कडाळे, शंकर गांगुर्डे, सचिन जाधव आदींसह निफाड, चांदवड येथील शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.प्रतिक्रि या........स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निफाड व चांदवड येथील आदिवासी बांधवांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. लोकप्रतिनिधीकडे दाद मागूनही प्रतिसाद मिळाला नाही, परिणामी नाशिक जिल्ह्यातील प्रशासनाला आदिवासींच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपली आहे.- प्र्रभाकर फसाळे, उत्तर महाराष्टÑ प्रमुख...................आदिवासी बांधव स्वातंत्र्य काळापूर्वीपासून मोलमजुरीसाठी स्थलांतर झाले आहे. निफाड व चांदवडमधील आदिवासी बांधवांना अद्यापही जातीचा दाखला मिळत नाही, याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाणी, रस्ता घरकुल, वीज आदी मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेना व समाजबांधवांचा येत्या काही दिवसातच आक्र ोश मोर्चा नाशिक जिल्हा प्रशासनाकडे दाखल होणार आहे.- संदीप गांगुर्डे, जिल्हाध्यक्ष