शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

शासकीय योजनांचा तीन महिन्यांनी आढावा

By admin | Updated: September 9, 2016 01:01 IST

मुख्यमंत्र्यांची घोषणा : उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा करणार सत्कार

नाशिक : शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्याबरोबरच यापुढे दर तीन महिन्यांनी विभागीय पातळीवर अशा प्रकारच्या बैठका घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक विभागाच्या आढावा बैठकीची माहिती फडणवीस यांनी पत्रकारांना दिली. ते म्हणाले, जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ६९३ गावांतील कामे पूर्ण झाली असून, १६२ गावांतील कामे ८० टक्क्याच्या पुढे आहेत तर ७० गावांतील कामे ५० टक्क्याच्या वर आहेत. १७ गावांतील कामे ५० टक्क्याच्या आत आहेत. ही कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, पावसाळा संपल्यानंतर तीन महिन्यांत कामे संपविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत व त्याचवेळी दुसऱ्या टप्प्यातील कामेही सुरू करण्यात येणार आहेत. या कामांबाबत प्रशासकीय यंत्रणेने समाधानकारक कामे केल्याचेही त्यांनी सांगितले. मागेल त्याला शेततळे या योजनेत राज्यात पन्नास हजार शेततळे करण्याचे ठरविण्यात आले असून, त्यापैकी चालू वर्षात ९६५४ शेततळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ७ हजार कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येऊन २१२१ शेततळे पूर्ण झाली आहेत. १८४७ कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. उर्वरित कामे शेतकऱ्यांचा हंगाम संपल्यांनंतर पूर्ण होतील. ज्यांची कामे पूर्ण होतील त्यांना पंधरा दिवसांत पैसे उपलब्ध करून दिले जातील, असे सांगितले. येत्या तीन वर्षांत राज्यात एक लाख सिंचन विहिरी पूर्ण करण्याचे शासनाने ठरविले असल्याचे सांगून फडणवीस पुढे म्हणाले की, गेल्या वर्षी ३५ हजार विहिरी पूर्ण करण्यात आल्या. चालू वर्षी ३० हजार विहिरी करण्यात येतील, त्यापैकी नाशिक विभागात १९ हजार होणार आहेत. सध्या १०३७ विहिरींची कामे सुरू असून, येत्या दोन वर्षांत २२४०० विहिरी पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले आहे. ज्या विहिरींची कामे पूर्ण झाली, त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला देण्यात आल्या आहेत. नाशिक विभागात ३०० ते ५०० विहिरींना अद्यापही वीज मिळालेली नसल्याचे या आढाव्यात लक्षात आले आहे. स्वच्छ भारत अभियानात सध्या सात हजार गावे हगणदारीमुक्त झाली असून, यंदा राज्य सरकारने राज्यातील ५० टक्के गावे हगणदारीमुक्त करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक तालुक्याला टार्गेट ठरवून देण्यात आले असून, डिसेंबर अखेर ते पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत नाशिक विभागात ४१६८५ घरे बांधण्यात येणार असून, त्यापैकी ९३ टक्के लोकांना अनुदानाच्या पहिल्या टप्प्यातील रक्कम अदा करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण झाल्यास त्यांना पैसे देण्याबाबत नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रमाई आंंबेडकर योजनेंतर्गत ३०१६१ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या दोन्ही योजनांतर्गत अनुसूचित जाती, जमातीच्या सर्व नागरिकांना २०१९ पर्यंत घरे दिली जातील, असेही ते म्हणाले. सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याचे सांगून, विशेष सहाय्य योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना म्हणजेच श्रावणबाळ, संजय गांधी योजना अशा योजनांना आधार कार्डशी जोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस महसूल खात्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार मीणा, सामान्य प्रशासन विभागाचे श्यामलाल गोयल, सामाजिक न्याय विभागाचे सुरेंद्रकुमार बागडे, ऊर्जा विभागाचे बिपीनकुमार श्रीमाळी, ग्रामविकास विभागाचे असीमकुमार गुप्ता, जमाबंदी आयुक्त संभाजीराव कडू पाटील, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)