शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!

By admin | Updated: August 1, 2015 23:49 IST

वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!

नाशिक : मनुष्याचे जीवन ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात सुख, दु:ख, संकट, आनंद, आजार आदि गोष्टी येतात. सुखाने माणसाची उमेद वाढते, तर दु:खाच्या क्षणी तो कोलमडून पडतो. तरीही नवीन उभारी घेऊन मार्ग काढतो. कधी अचानक अशी घटना घडते की, त्याचे आयुष्य बदलून जाते. अत्यंत वैभवात वावरणारा माणूस या सर्व सुखांचा त्याग करून वैराग्य पत्करतो.साधुग्रामचा फेरफटका मारला असता अशीही काही माणसे भेटतात. असाच एक अवलिया बाबा म्हणजे दिग्विजय महाराज होय. अत्यंत उच्चविभूषित म्हणजे पीएच.डी. केलेल्या एखाद्या माणसाने विद्यापीठात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य करण्याऐवजी एखाद्या आश्रमाचा मार्ग धरून दाढी वाढवावी आणि साधू बनावे हे पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे एका राजघराण्याचा वारसा लाभलेल्या माणसाने सर्व ऐश्वर्याचा त्याग करावा हे ऐकून धक्काच बसू शकतो. परंतु दिग्विजय महाराज यांच्याबाबत ही गोष्ट घडली आहे. साधुग्राममधील अखिल भारतीय दिगंबर आखाड्यात दाखल झालेले दिग्विजय महाराज सांगतात की, बिहार राज्यातील म्हणजे तत्कालीन मगध प्रांतातील सूर्यपुरा नगरी हे आमचे गाव. राजा राधिकारमण हे आमचे पणजोबा. या प्रांताचे राजे होते. पिढीजात श्रीमंती असल्याने काहीही कमतरता नव्हती. आम्ही चार भावंडे. त्यापैकी मी सर्वात मोठा होतो. आमचे बालपण सुखात गेले. शिक्षण सुरू होते. मला सर्व विषयांची आवड होती. वाचनाचा खूप नाद होता. मगध विद्यापीठातून हिंदी विषयाची पीएच.डी. ची पदवी घेतली. परंतु दरम्यानच्या काळात माझ्या तिन्ही भांवडांचे निधन झाले. अतिव दु:खाने व्याकूळ झालो. काय करावे सुचेना. जगण्याची इच्छा उरली नाही म्हणून एका पहाडावर गेलो. तेथील उंच कड्यावरून उडी मारली, तरी जिवंत राहिलो. साक्षात रामभक्त हनुमंतांनी (महाराजांनी) माझा जीव वाचविला. त्यामुळे ठरविले की, यापुढे सर्व आयुष्य हे धर्मकार्यासाठी खर्च करायचे आणि जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. अनेक आश्रमांत गेलो, रानावनात फिरलो, धर्म-अध्यात्माचा अभ्यास केला. आता लोकांना धर्म आणि अध्यात्म समजावून सांगत आहे, असेही महाराज म्हणाले.