शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!

By admin | Updated: August 1, 2015 23:49 IST

वैभवाचा त्याग करून पत्करले वैराग्य!

नाशिक : मनुष्याचे जीवन ही जन्मापासून मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात सुख, दु:ख, संकट, आनंद, आजार आदि गोष्टी येतात. सुखाने माणसाची उमेद वाढते, तर दु:खाच्या क्षणी तो कोलमडून पडतो. तरीही नवीन उभारी घेऊन मार्ग काढतो. कधी अचानक अशी घटना घडते की, त्याचे आयुष्य बदलून जाते. अत्यंत वैभवात वावरणारा माणूस या सर्व सुखांचा त्याग करून वैराग्य पत्करतो.साधुग्रामचा फेरफटका मारला असता अशीही काही माणसे भेटतात. असाच एक अवलिया बाबा म्हणजे दिग्विजय महाराज होय. अत्यंत उच्चविभूषित म्हणजे पीएच.डी. केलेल्या एखाद्या माणसाने विद्यापीठात किंवा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य करण्याऐवजी एखाद्या आश्रमाचा मार्ग धरून दाढी वाढवावी आणि साधू बनावे हे पाहून कुणालाही आश्चर्यच वाटेल. विशेष म्हणजे एका राजघराण्याचा वारसा लाभलेल्या माणसाने सर्व ऐश्वर्याचा त्याग करावा हे ऐकून धक्काच बसू शकतो. परंतु दिग्विजय महाराज यांच्याबाबत ही गोष्ट घडली आहे. साधुग्राममधील अखिल भारतीय दिगंबर आखाड्यात दाखल झालेले दिग्विजय महाराज सांगतात की, बिहार राज्यातील म्हणजे तत्कालीन मगध प्रांतातील सूर्यपुरा नगरी हे आमचे गाव. राजा राधिकारमण हे आमचे पणजोबा. या प्रांताचे राजे होते. पिढीजात श्रीमंती असल्याने काहीही कमतरता नव्हती. आम्ही चार भावंडे. त्यापैकी मी सर्वात मोठा होतो. आमचे बालपण सुखात गेले. शिक्षण सुरू होते. मला सर्व विषयांची आवड होती. वाचनाचा खूप नाद होता. मगध विद्यापीठातून हिंदी विषयाची पीएच.डी. ची पदवी घेतली. परंतु दरम्यानच्या काळात माझ्या तिन्ही भांवडांचे निधन झाले. अतिव दु:खाने व्याकूळ झालो. काय करावे सुचेना. जगण्याची इच्छा उरली नाही म्हणून एका पहाडावर गेलो. तेथील उंच कड्यावरून उडी मारली, तरी जिवंत राहिलो. साक्षात रामभक्त हनुमंतांनी (महाराजांनी) माझा जीव वाचविला. त्यामुळे ठरविले की, यापुढे सर्व आयुष्य हे धर्मकार्यासाठी खर्च करायचे आणि जीवनाला एक वेगळीच दिशा मिळाली. अनेक आश्रमांत गेलो, रानावनात फिरलो, धर्म-अध्यात्माचा अभ्यास केला. आता लोकांना धर्म आणि अध्यात्म समजावून सांगत आहे, असेही महाराज म्हणाले.