शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

महसूलच्या नव्या इमारतीला गेले तडे

By admin | Updated: May 27, 2014 17:00 IST

प्रवीण साळुंके ल्ल मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधलेल्या महसूल विभागाच्या इमारतीला वर्षभरातच तडे पडले आहेत.

 प्रवीण साळुंके ल्ल मालेगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधलेल्या महसूल विभागाच्या इमारतीला वर्षभरातच तडे पडले आहेत. यामुळे इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघड झाले आहे. या कामासह संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. महसूल विभागाला जुनी इमारत कमी पडू लागल्याने शासनाने नवीन इमारतीसाठी निधी मंजूर केला. इमारतीसाठी राखीव असलेल्या जागेवर बांधकाम करण्यासाठी नियमानुसार महानगरपालिकेची परवानगी घेणे आवश्यक होते, मात्र कोणतीही परवानगी न घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतीचे बांधकाम केले. बांधकाम परवानगी नसतानाही या विभागाने शासकीय निधी खर्च केला, याची अद्याप कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. निकृष्ट बांधकामामुळे वर्षभरातच इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. यात इमारतीचा दर्शनी भाग, तहसीलदारांच्या केबिन बाहेर, प्रांत कार्यालयातील बैठक किंवा कार्यक्रमगृह, अपील शाखा आदि विभागांच्या भिंतीचा समावेश आहे. दिवासागणिक तड्यांमध्ये भर पडत आहे. काही तडे एक ते दीड इंचाचे आहेत, तर काही ठिकाणी या पेक्षाही मोठे तडे पडलेले आहेत. काही ठिकाणी भिंत व बिममध्ये तडे पडून त्यातील अंतर वाढत असल्याने भिंतीच्या सुरक्षेविषयी शंका उपस्थित केली जात आहे. सर्वात मोठे तडे अपील शाखेत दीड ते दोन इंचाचे आहेत. यात भर पडून छपराचे प्लॅस्टर पडण्यास सुरुवात झाली आहे. इमारतीच्या चारही बाजूच्या भिंतीतून पहिल्याच पावसाळ््यात पाणी पाझरण्याची शक्यता आहे. तहसीलचा फेरफार कक्ष, प्रांत कार्यालय, मुख्य भिंती आदि ठिकाणी पाणी पाझरते. मोठ्या प्रमाणावर भिंतीचा रंग खराब झाला असून, प्लॅस्टरही खराब होत आहे. हे प्लॅस्टर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रांत केबिन बाहेरील व प्रांत कर्मचारी कक्ष या दोनही भिंती अर्ध्या भागापर्यंत पाझरत असून, मांडणीवरील कागदांचे नुकसान होत आहे. तहसीलच्या फेरफार कक्षात भिंतीला खड्डे पडले आहेत. या इमारतीला बांधकाम परवानगी नसताना तसेच परवानगी मिळण्यापूर्वी महसूल विभागाने या कामाची साधी चौकशीही केली नसल्याचे उघड झाले आहे. कायदेशीर परवानगी नसतानाही इमारतीचे बांधकाम थांबविण्यात न आल्याने चर्चा होत आहे. इमारतीला परवानगी नसतानाही तत्कालीन अधिकार्‍यांनी येथे कार्यालय सुरू केले हे विशेष. कार्यालय सुरू करण्याची त्यांना काय घाई होती? असा प्रश्न विचारला जात आहे. नियमानुसार संबंधित विभागाकडून इमारत बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला व तपासणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच रीतसर इमारतीचा ताबा घेऊन कार्यालय सुरू करणे आवश्यक होते. मात्र इमारतीचा कोणताही अधिकृत ताबा नसतांना इमारतीत कार्यालय थाटून ठेकेदाराला पाठीशी घालण्यात आले असा आरोप संबंधितांवर केला जात आहे. याची चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. शहरात सामान्य नागरिकांनी कच्चे घर बांधले तरी गल्लीबोळात जाऊन त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणारे महानगरपालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत काय करीत होते ? मध्यवर्ती भागात सुरू असलेले इमारतीचे काम मनपाच्या अधिकार्‍यांना कसे दिसले नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील महसूल, बांधकाम व मनपाच्या अधिकार्‍यांचे ठेकेदाराशी सलेल्या साटेलोट्याची तसेच संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.