शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

महसूल विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे ...

जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे पुरवठा विभागासाठी उपलब्ध होणार आहेत. तीन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता असणारी ही गुदामे असून जवळपास प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ही गुदामे आता उपलब्ध होणार आहेत. जुन्या गुदामांची क्षमता कमी असल्याने धान्य साठवणुकीचा प्रश्न निर्माण होत होता. आता नव्या गुदामांमुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

सर्वांसाठी रेशनकार्ड

रेशनवरील धान्य मिळण्यासाठी पात्र असलेला कुणीही या योजनेपासून वंचित राहाणार नाही यासाठी नवीन वर्षात शंभर टक्के संगणकीकरण केले जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग तसेच मोबाइल लिकिंग तपासले जाणार आहे. यातून योग्य लाभार्थी असेल त्यालाच रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धान्य वाटप मोहीम अधिक गतिमान होणार आहे. जे लोक रेशनकार्ड वापरत नाहीत त्यांचे कार्ड रद्द करून जे गरजू आहेत अशांनाच रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम राबविली जाणार आहे.

ग्रामपंचायती रोखणार अवैध उत्खनन

अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे. याबाबतचे पत्र नवीन वर्षात ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. आपल्या तालुक्यात होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी ग्रामपंतायतींनी माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ग्रामपंचायतींचा त्यात सहभाग आढळून आला तर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचीसुद्धा तरतूद असणार आहे. चाेरी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढावा या हेतून ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे.

शेतात पोहचणार सौर ऊर्जा

राज्यातील शेतक-यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील २५ हजार आणि दुस-या व तिस-या टप्प्यातील उर्वरित ७५ हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा पोहचणार आहे.