शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
2
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
3
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
4
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
6
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
7
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
8
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
9
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
10
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
11
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
12
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
13
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
14
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
15
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
16
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
17
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
18
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
19
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
20
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?

महसूल विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:09 IST

जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे ...

जिल्ह्याला धान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाकडे जुने बांधकाम रचनेतील कमी क्षमतेची गुदामे होती. आता नवीन वर्षात १३ नवी गुदामे पुरवठा विभागासाठी उपलब्ध होणार आहेत. तीन हजार मेट्रिक टन साठवणूक क्षमता असणारी ही गुदामे असून जवळपास प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ही गुदामे आता उपलब्ध होणार आहेत. जुन्या गुदामांची क्षमता कमी असल्याने धान्य साठवणुकीचा प्रश्न निर्माण होत होता. आता नव्या गुदामांमुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे.

सर्वांसाठी रेशनकार्ड

रेशनवरील धान्य मिळण्यासाठी पात्र असलेला कुणीही या योजनेपासून वंचित राहाणार नाही यासाठी नवीन वर्षात शंभर टक्के संगणकीकरण केले जाणार आहे. लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग तसेच मोबाइल लिकिंग तपासले जाणार आहे. यातून योग्य लाभार्थी असेल त्यालाच रेशनकार्ड उपलब्ध होणार आहे. त्यामुळे धान्य वाटप मोहीम अधिक गतिमान होणार आहे. जे लोक रेशनकार्ड वापरत नाहीत त्यांचे कार्ड रद्द करून जे गरजू आहेत अशांनाच रेशनकार्ड उपलब्ध करून देण्यासाठीची मोहीम राबविली जाणार आहे.

ग्रामपंचायती रोखणार अवैध उत्खनन

अवैध उत्खनन रोखण्यासाठी आता ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे. याबाबतचे पत्र नवीन वर्षात ग्रामपंचायतींना दिले जाणार आहे. आपल्या तालुक्यात होणारे अवैध उत्खनन रोखण्यासाठी ग्रामपंतायतींनी माहिती देणे बंधनकारक करण्यात येणार असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ग्रामपंचायतींचा त्यात सहभाग आढळून आला तर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचीसुद्धा तरतूद असणार आहे. चाेरी रोखण्यासाठी लोकसहभाग वाढावा या हेतून ग्रामपंचायतींना सामावून घेतले जाणार आहे.

शेतात पोहचणार सौर ऊर्जा

राज्यातील शेतक-यांना दिवसा तसेच शाश्वत ऊर्जेच्या माध्यमातून वीज पुरवठा व्हावा, यासाठी राज्य शासनाकडून मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेनुसार पहिल्या टप्प्यातील २५ हजार आणि दुस-या व तिस-या टप्प्यातील उर्वरित ७५ हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या शेतात सौर ऊर्जा पोहचणार आहे.