शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

परवाने परत केले, संचालकपदाचे काय?

By admin | Updated: July 22, 2016 00:12 IST

बाजार समिती : जिल्ह्यातील व्यापारी गटाच्या २८ प्रतिनिधींबाबत प्रश्नचिन्ह

 संजय वाघ नाशिकजिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी निगडित व्यापाऱ्यांनी परवाने तर परत केले; पण ज्या परवान्याच्या आधारे निवडणूक जिंकली त्या संचालकपदाचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. परवाने नसलेल्या व्यापारी संचालकांचे पद आता धोक्यात आले असून, याबाबत जिल्हा निबंधक काय पावले उचलतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.फळे व भाजीपाला नियमनमुक्त करून बाजार समितीचे त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने २८ जूनला घेतला होता. या निर्णयावर व्यापारीवर्गाने नाराजी व्यक्त करीत राज्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी विरोध दर्शविला होता. सरकारच्या धोरणाविरोधात राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी असहकाराचे धोरण अवलंबून परवाने परत करण्याची मोहीम उघडली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील आठ बाजार समिती कार्यक्षेत्रातील १५४६ व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले होते. त्यात कळवण (७०), सटाणा (१५३), चांदवड (११७), येवला (५९), नांदगाव (९४), दिंडोरी (३४), पिंपळगाव बसवंत (५५३) आणि लासलगाव (४६६) यांचा समावेश होता. व्यापाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोंडी झालेली असून, बाजार समित्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावरदेखील पाणी फिरले आहे.दरम्यान, बाजार समित्यांच्या व्यापारी गटातून निवडणूक लढविण्यासाठी परवाना (अनुज्ञप्ती) आवश्यक असतो. ज्या परवान्याच्या आधारे व्यापाऱ्यांनी निवडणूक लढवून व्यापारी संचालकपद प्राप्त केले, तोच परवाना परत करून व्यापाऱ्यांनी शासनाला व शेतकऱ्यांना एकार्थाने वेठीसच धरले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधील २८ व्यापारी संचालकांच्या पदाबाबत जिल्हा निबंधक काय भूमिका घेतात याबाबतही जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.