शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

परवाने परत केले, संचालकपदाचे काय?

By admin | Updated: July 22, 2016 00:12 IST

बाजार समिती : जिल्ह्यातील व्यापारी गटाच्या २८ प्रतिनिधींबाबत प्रश्नचिन्ह

 संजय वाघ नाशिकजिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांशी निगडित व्यापाऱ्यांनी परवाने तर परत केले; पण ज्या परवान्याच्या आधारे निवडणूक जिंकली त्या संचालकपदाचे काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. परवाने नसलेल्या व्यापारी संचालकांचे पद आता धोक्यात आले असून, याबाबत जिल्हा निबंधक काय पावले उचलतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.फळे व भाजीपाला नियमनमुक्त करून बाजार समितीचे त्याच्यावर नियंत्रण राहणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने २८ जूनला घेतला होता. या निर्णयावर व्यापारीवर्गाने नाराजी व्यक्त करीत राज्यातील बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी विरोध दर्शविला होता. सरकारच्या धोरणाविरोधात राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमधील व्यापारी व आडत्यांनी असहकाराचे धोरण अवलंबून परवाने परत करण्याची मोहीम उघडली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील आठ बाजार समिती कार्यक्षेत्रातील १५४६ व्यापाऱ्यांनी आपले परवाने परत केले होते. त्यात कळवण (७०), सटाणा (१५३), चांदवड (११७), येवला (५९), नांदगाव (९४), दिंडोरी (३४), पिंपळगाव बसवंत (५५३) आणि लासलगाव (४६६) यांचा समावेश होता. व्यापाऱ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कोंडी झालेली असून, बाजार समित्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या उत्पन्नावरदेखील पाणी फिरले आहे.दरम्यान, बाजार समित्यांच्या व्यापारी गटातून निवडणूक लढविण्यासाठी परवाना (अनुज्ञप्ती) आवश्यक असतो. ज्या परवान्याच्या आधारे व्यापाऱ्यांनी निवडणूक लढवून व्यापारी संचालकपद प्राप्त केले, तोच परवाना परत करून व्यापाऱ्यांनी शासनाला व शेतकऱ्यांना एकार्थाने वेठीसच धरले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांमधील २८ व्यापारी संचालकांच्या पदाबाबत जिल्हा निबंधक काय भूमिका घेतात याबाबतही जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.