शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:24 IST

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : भाविकांची संख्या रोडावल्याने कोजागरीवर आशा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.गडावर शेकडोच्या संख्येने विविध व्यावसायिक आहेत. उत्सव कालावधीत त्यांच्या संख्येत वाढ होते. यात्रोत्सव काळात व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने गुंतवणूक परताव्याच्या भरवशावर करण्यात येते; मात्र या खेपेस विविध आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची माहिती ईश्वर कदम यांनी दिली.नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गड व परिसरात पावसाने थैमान घातले होते. उत्सव काळातही पावसाने ठरावीक दिवसानंतर हजेरी लावली. त्यात एसटी बसचा अपघात झाला. तसेच नांदुरी-गड मार्गावर दरड कोसळली होती. अवघ्या तासभरात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली. यामुळे भाविकांच्या मनात चलबिचल झाली व याचा नकारात्मक परिणाम भाविकांवर झाला.फ्यूनिक्युलर ट्रॉली परिसरातील संकुलात सुमारे पन्नासच्या पुढे दुकाने आहेत. बहुतांशी भाविक ट्रॉलीत प्रवास करण्यास अग्रक्र म देतात. नारळ प्रसाद व इतर वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होतो त्यामुळे तोही फटका बसल्याची माहिती सोमनाथ कोकाटे, रेखा जोशी, प्रमिला मोरे, रघुनाथ जोशी, गिरीश गवळी यांनी दिली. दिवाळी सण तोंडावर आला आहे, धंदाच नाही तर सण साजरा कसा करणार? त्यात उधार उसनवार करून, कर्ज काढून व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक परतावा करणे अवघड झाले असून, नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन दिवसात थोडाफार व्यवसाय झाला तरी गुंतवणुकीच्या मानाने तो पुरेसा नसल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.परराज्यासह राज्यातील भाविकांची संख्या कमीभाविकांच्या संख्येत घट झाल्याने व्यावसायिकांना ग्राहकाची वाट पहावी लागल्याची माहिती व्यावसायिक नाना कानडे यांनी दिली. महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले होते. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व गुजरात राज्यातही पावसाने कहर केल्याने तेथील प्रतिवर्षी येणारे भाविक गडावर आले नाहीत. त्याचा फटका सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बसल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बत्तासे यांनी दिली.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरbusinessव्यवसाय