शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:24 IST

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : भाविकांची संख्या रोडावल्याने कोजागरीवर आशा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.गडावर शेकडोच्या संख्येने विविध व्यावसायिक आहेत. उत्सव कालावधीत त्यांच्या संख्येत वाढ होते. यात्रोत्सव काळात व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने गुंतवणूक परताव्याच्या भरवशावर करण्यात येते; मात्र या खेपेस विविध आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची माहिती ईश्वर कदम यांनी दिली.नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गड व परिसरात पावसाने थैमान घातले होते. उत्सव काळातही पावसाने ठरावीक दिवसानंतर हजेरी लावली. त्यात एसटी बसचा अपघात झाला. तसेच नांदुरी-गड मार्गावर दरड कोसळली होती. अवघ्या तासभरात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली. यामुळे भाविकांच्या मनात चलबिचल झाली व याचा नकारात्मक परिणाम भाविकांवर झाला.फ्यूनिक्युलर ट्रॉली परिसरातील संकुलात सुमारे पन्नासच्या पुढे दुकाने आहेत. बहुतांशी भाविक ट्रॉलीत प्रवास करण्यास अग्रक्र म देतात. नारळ प्रसाद व इतर वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होतो त्यामुळे तोही फटका बसल्याची माहिती सोमनाथ कोकाटे, रेखा जोशी, प्रमिला मोरे, रघुनाथ जोशी, गिरीश गवळी यांनी दिली. दिवाळी सण तोंडावर आला आहे, धंदाच नाही तर सण साजरा कसा करणार? त्यात उधार उसनवार करून, कर्ज काढून व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक परतावा करणे अवघड झाले असून, नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन दिवसात थोडाफार व्यवसाय झाला तरी गुंतवणुकीच्या मानाने तो पुरेसा नसल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.परराज्यासह राज्यातील भाविकांची संख्या कमीभाविकांच्या संख्येत घट झाल्याने व्यावसायिकांना ग्राहकाची वाट पहावी लागल्याची माहिती व्यावसायिक नाना कानडे यांनी दिली. महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले होते. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व गुजरात राज्यातही पावसाने कहर केल्याने तेथील प्रतिवर्षी येणारे भाविक गडावर आले नाहीत. त्याचा फटका सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बसल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बत्तासे यांनी दिली.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरbusinessव्यवसाय