शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा व्यावसायिकांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 23:24 IST

वणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : भाविकांची संख्या रोडावल्याने कोजागरीवर आशा

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : नवरात्रोत्सव कालावधीत मोठी आर्थिक उलाढाल होईल या आशेने गुंतवणूक करणाऱ्या सप्तशृंगगडावरील व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडली आहे. यंदा भाविकांच्या संख्येत घट झाल्याने व परतीच्या पावसाने कहर केल्याने व्यवसायावर परिणाम दिसून आला. त्यामुळे व्यावसायिकांचे डोळे आता कोजागरी पौर्णिमेकडे लागले आहेत.गडावर शेकडोच्या संख्येने विविध व्यावसायिक आहेत. उत्सव कालावधीत त्यांच्या संख्येत वाढ होते. यात्रोत्सव काळात व्यवसायाच्या माध्यमातून चार पैसे मिळतील अशा अपेक्षेने गुंतवणूक परताव्याच्या भरवशावर करण्यात येते; मात्र या खेपेस विविध आलेल्या अनपेक्षित संकटांमुळे व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला असल्याची माहिती ईश्वर कदम यांनी दिली.नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी गड व परिसरात पावसाने थैमान घातले होते. उत्सव काळातही पावसाने ठरावीक दिवसानंतर हजेरी लावली. त्यात एसटी बसचा अपघात झाला. तसेच नांदुरी-गड मार्गावर दरड कोसळली होती. अवघ्या तासभरात रस्त्यावरील अडथळे दूर करण्यात आले व वाहतूक सुरळीत झाली. यामुळे भाविकांच्या मनात चलबिचल झाली व याचा नकारात्मक परिणाम भाविकांवर झाला.फ्यूनिक्युलर ट्रॉली परिसरातील संकुलात सुमारे पन्नासच्या पुढे दुकाने आहेत. बहुतांशी भाविक ट्रॉलीत प्रवास करण्यास अग्रक्र म देतात. नारळ प्रसाद व इतर वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम ग्राहकांवर होतो त्यामुळे तोही फटका बसल्याची माहिती सोमनाथ कोकाटे, रेखा जोशी, प्रमिला मोरे, रघुनाथ जोशी, गिरीश गवळी यांनी दिली. दिवाळी सण तोंडावर आला आहे, धंदाच नाही तर सण साजरा कसा करणार? त्यात उधार उसनवार करून, कर्ज काढून व्यवसायासाठी केलेली गुंतवणूक परतावा करणे अवघड झाले असून, नवरात्रोत्सवाच्या दोन ते तीन दिवसात थोडाफार व्यवसाय झाला तरी गुंतवणुकीच्या मानाने तो पुरेसा नसल्याने आर्थिक कोंडी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.परराज्यासह राज्यातील भाविकांची संख्या कमीभाविकांच्या संख्येत घट झाल्याने व्यावसायिकांना ग्राहकाची वाट पहावी लागल्याची माहिती व्यावसायिक नाना कानडे यांनी दिली. महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातले होते. पुणे, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व गुजरात राज्यातही पावसाने कहर केल्याने तेथील प्रतिवर्षी येणारे भाविक गडावर आले नाहीत. त्याचा फटका सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना बसल्याची माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश बत्तासे यांनी दिली.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरbusinessव्यवसाय