शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांकडून परवाने परत

By admin | Updated: July 17, 2016 01:05 IST

अडतदारांचा समावेश : राज्य शासनाच्या बाजार नियमन मुक्त धोरणाचा निषेध

 पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीचे अडतदार, व्यापाऱ्यांनी आपली अडत व खरेदीचे परवाने बाजार समितीकडे सादर केले.शासनाने नियमन मुक्त धोरण अवलंबल्याचा स्वीकार करत व्यापारीवर्गाने त्याचे स्वागत केले; मात्र या नियमन मुक्त करताना फक्त शहरी बाजार समित्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. मुळात शेतकरी हा १९६८च्या कायद्यानुसार केव्हाही मुक्तपणे आपला शेतमाल कुठेही नेऊन विक्र ी करू शकतो. आज ग्रामीण भागातील बाजार समितीचा विचार केला तर या बाजार समितीमध्ये शेतमालाचा उघडपणे व्यवहार आहे तसेच माल विकला गेल्यावर तत्काळ पैसे देणे बंधनकारक आहे. या भागातील शेतकरी हा बाजार समितीच्या कामामुळे किंवा येथील व्यवहारामुळे खुश होता. त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास नव्हता. या उलट शहरातील बाजार समितीच्या कामात मोठी तफावत आहे. या ठिकाणच्या व्यवहारात शेतकरीवर्गाची पिळवणूक होत आहे. या ठिकाणी भाजीपाला डोळ्यासमोर ठेवून शासनाने हा निर्णय घेणे योग्यच समजावा; मात्र जर कांदा, टमाटा, डाळींब, कडधान्य आदिंचा व्यवहार या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालत असताना शासनाचा हा निर्णय व्यापारीवर्गाला न परवडणारा आहे. आम्ही शेतकरीवर्गाचा माल बांधावर जाऊन खरेदी करू यात आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही. बाजार समितीमध्ये खरेदी केलेल्या मालावरील खर्च हा आम्हाला न परवडणारा असल्याने आमचे परवाने आम्ही बाजार समितीकडे सुपूर्द करत असल्याचे व्यापारीवर्गानी पत्रात नमूद केले आहे. (वार्ताहर)