शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत येथील व्यापाऱ्यांकडून परवाने परत

By admin | Updated: July 17, 2016 01:05 IST

अडतदारांचा समावेश : राज्य शासनाच्या बाजार नियमन मुक्त धोरणाचा निषेध

 पिंपळगाव बसवंत : येथील बाजार समितीचे अडतदार, व्यापाऱ्यांनी आपली अडत व खरेदीचे परवाने बाजार समितीकडे सादर केले.शासनाने नियमन मुक्त धोरण अवलंबल्याचा स्वीकार करत व्यापारीवर्गाने त्याचे स्वागत केले; मात्र या नियमन मुक्त करताना फक्त शहरी बाजार समित्या डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला. मुळात शेतकरी हा १९६८च्या कायद्यानुसार केव्हाही मुक्तपणे आपला शेतमाल कुठेही नेऊन विक्र ी करू शकतो. आज ग्रामीण भागातील बाजार समितीचा विचार केला तर या बाजार समितीमध्ये शेतमालाचा उघडपणे व्यवहार आहे तसेच माल विकला गेल्यावर तत्काळ पैसे देणे बंधनकारक आहे. या भागातील शेतकरी हा बाजार समितीच्या कामामुळे किंवा येथील व्यवहारामुळे खुश होता. त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास नव्हता. या उलट शहरातील बाजार समितीच्या कामात मोठी तफावत आहे. या ठिकाणच्या व्यवहारात शेतकरीवर्गाची पिळवणूक होत आहे. या ठिकाणी भाजीपाला डोळ्यासमोर ठेवून शासनाने हा निर्णय घेणे योग्यच समजावा; मात्र जर कांदा, टमाटा, डाळींब, कडधान्य आदिंचा व्यवहार या ठिकाणच्या बाजार समितीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे चालत असताना शासनाचा हा निर्णय व्यापारीवर्गाला न परवडणारा आहे. आम्ही शेतकरीवर्गाचा माल बांधावर जाऊन खरेदी करू यात आम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च लागणार नाही. बाजार समितीमध्ये खरेदी केलेल्या मालावरील खर्च हा आम्हाला न परवडणारा असल्याने आमचे परवाने आम्ही बाजार समितीकडे सुपूर्द करत असल्याचे व्यापारीवर्गानी पत्रात नमूद केले आहे. (वार्ताहर)