शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षकांचा परतीचा प्रवास ठरला अखेरचा प्रवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST

बुधवारी पावणे पाच वाजताच्या दरम्यान वणी येथे सर्वांनी सोबत चहा घेतला. पाऊस जोरात सुरू झाल्याने लवकर घरी पोहोचू, ...

बुधवारी पावणे पाच वाजताच्या दरम्यान वणी येथे सर्वांनी सोबत चहा घेतला. पाऊस जोरात सुरू झाल्याने लवकर घरी पोहोचू, असे म्हणत रामजी भोये, नितेश तायडे, दत्तात्रय बच्छाव, विकास शिंदे, मनोज वाघ, प्रदीप अहिरे, ए. डी. बोरसे, कारचालक सचिन पवार असे सर्व नाशिकच्या दिशेने निघाले. त्यावेळी रस्त्यात ए. झाड पडलेले दिसल्याने पावसाळ्यात वृक्षांपासून धोका असतो, त्यामुळे धोकादायक वृक्ष आणि फांद्या हटविण्याचे काम महिनाभर पहिले केले पाहिजे, असा रामजी भोये यांनी चर्चेचा विषय छेडला. दुर्दैवाने काही अंतर कापले जात नाही, तोच त्यांच्याच मोटारीवर रस्त्यालगतचे ए. वाळलेले मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुन येथील रामजी भोये, दत्तात्रय बच्छाव व नितेश तायडे या तिघा शिक्षकांचा दुर्दैवी अंत झाला. जखमी शिक्षकांनी ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधींशी संवाद साधताना वाहनातील धोकादायक वृक्षांच्या विषयावरील चर्चेला उजाळा दिला असता, त्यांना अश्रू अनावर झाले. मयत भोये व बच्छाव दिंडोरी रोडवर ओमकार नगरमध्ये तर तायडे रासबिहारी शाळेजवळ राहत होते. भोये यांच्या पश्चात पत्नी तसेच दोन मुले व मुलगी असून, तिघेही मुले शिक्षण घेत आहेत. बच्छाव यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून, त्यांच्या पत्नीदेखील शिक्षक आहेत. तायडे यांच्या पश्चात पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे.

--इन्फो---

पंचवटीत हळहळ

सोमवारी सकाळी सर्वजण चारचाकीतून शालेय कामकाजासाठी संस्थेत गेले. त्यानंतर बारावीचा निकाल तयार करण्याचे काम करून बोर्डाकडे रवाना केले. बुधवारी नेहमीप्रमाणे घराकडचा प्रवास सुरू झाला. काही शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी करायची असल्याने दुपारी सुरगाण्यात चाचणीही केली.

रामजी भोये मूळचे हरसुल करंजपाना येथील तर दत्तात्रय बच्छाव माळवाडी बेज देवळा आणि नितेश तायडे हे जळगाव येथील रहिवासी होते; मात्र हे तिघेही मयत शिक्षक पंचवटी भागात वास्तव्यास होते.