शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
4
MS धोनीला कायदेशीर चॅलेंज! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
5
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
6
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
7
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
8
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
9
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
10
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
11
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
12
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
13
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
14
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
15
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?
16
"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का
17
"माझे हात थरथरत होते, ऐश्वर्या रायच्या ब्लाउजचं हूक..."; अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!
20
Gold Silver Price 8 July: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; किंमत लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

भाविक परतीच्या प्रवासाला...

By admin | Updated: January 24, 2017 22:40 IST

भाविक परतीच्या प्रवासाला...

त्र्यंबकेश्वर : पौष वद्य द्वादशीला एकादशीचा उपवास काल्याच्या कीर्तनाने सोडून संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या यात्रेची सांगता झाली. त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भाविकांनी निवृत्तिरायांचे दर्शन घेत जड अंत:करणाने त्र्यंबकेश्वर सोडले. दिंडीने आलेले भाविक ट्रॅक्टर, ट्रक आदि वाहनांमधून गावाकडे परतू लागले आहेत. अनेकांनी परिवहन महामंडळाच्या बसेसने परतीचा प्रवास सुरू केला आहे. यात्रेत १२ ते १५ महिला खिसेकापू पकडण्यात आल्या. विशेष म्हणजे या सर्व तरुण स्त्रिया असून, आपले कौर्यकृत्य करताना त्यांच्या कडेवर लहान बालके असतात. या खिसेकापू पकडल्या तरी पोलीस ठाण्यात त्यांची झडती घेताना ते लहान मुले मोठमोठ्याने रडत अक्षरश: पोलीस ठाणे डोक्यावर घेतात. याशिवाय ज्यांची चोरी झाली आहे तेही कोणी पोलिसांकडे फिर्याद देत नाहीत. पोलीस झंझटीत न अडकता नुकसान सहन करतात आणि त्यामुळेच या महिलांचे फावते.  त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात अपघातात जखमी झालेले रुग्ण गणपत बारी, जव्हार फाटा, निवृत्तिनाथ मंदिराजवळ, कदम (पिंपळगाव बसवंत), पेट्रोलपंपासमोर असे ४ ते ५ रुग्ण जखमी होऊन नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत तर काहीजण उपचार घेत आहेत. एका यात्रेकरूचा हृदय क्रिया बंद पडून मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात खिसेकापू महिलांवर केसेस दाखल करून न्यायालयात पाठविण्यात आले आहे. परिवहन मंडळाच्या बसेसची कमी नाही. एकापाठोपाठ बस सोडण्यात येत आहेत. २८३ टायमिंगव्यतिरिक्त (२००+८३ जव्हार, पालघर)जादा बसेस सोडण्यात येत आहेत. यामध्ये थेट कळवण १४ बसेस, नांदगाव ९, येवला ६, लासलगाव ९, पेठ १५, सिन्नर २६, सटाणा १४, मनमाड १५, पिंपळगाव बसवंत १४, इगतपुरी १८, मालेगाव १५, नाशिक डेपो-१ - ६, नाशिक- २- २ याशिवाय जव्हार, पालघर ८३ तर नाशिक २०० ह्या बसेस रात्री १२ पासून आज दुपारी १.३० पर्यंत सोडण्यात आल्या आहेत. या बस सेवेवर स्वत: विभाग नियंत्रक यामिनी जोशी, आगार व्यवस्थापक किशोर पाटील, यात्राप्रमुख रणजित ढाकणे, स्थानकप्रमुख शरद झोले आदि लक्ष देऊन होते.  यात्रा जव्हार रोड परिसरात जास्त असल्याने या भागात व्यावसायिकांनी बऱ्यापैकी व्यवसाय केला. बरेच व्यावसायिकांनी धंदा नाही धंदा नाही अशी तक्रार केली. अर्थात तात्पुरते, कायम दुकानदारांचा धंदा व्हायचा तो झाला आहेच.  दरम्यान, नगरपालिकेचे नियोजन चुकले. बऱ्याच भागात पथदीप बसविले नाहीत. परिणामी अंधाराचे साम्राज्य पसरले. अनेक गल्ली-बोळात सफाई न झाल्याने कचरा जमा झाला तर गर्दीमुळे घंटागाड्या बंद करण्यात आल्या. अनेक गरीब व्यावसायिकांची छोटी छोटी दुकाने अतिक्रमणाच्या नावाखाली उठविण्यात आली किंवा ट्रॅक्टरमध्ये जमा केले तर अनेक ठिकाणी रस्त्यावरच दुकाने लावली होती तिकडे मात्र लक्षच दिले नाही. दरम्यान, बुधवारी (दि. २५) मानाच्या आलेल्या दिंडीप्रमुखांचा सत्कार समाधी संस्थानतर्फे नारळ, कुंकू, उपरणे, बुक्का लावून सत्कार करण्यात येणार आहे. निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. संजयनाना धोंगडे, सचिव पवनकुमार भुतडा व अन्य विश्वस्तांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. सर्व मानाच्या दिंड्यांचे प्रमुख उपस्थित असतात.