शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

सिन्नर महाविद्यालयात सेवापूर्ती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:11 IST

----- स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया सुरू करण्याची मागणी सिन्नर : स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी परफेक्ट करिअर अकॅडमीच्या ...

-----

स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया सुरू करण्याची मागणी

सिन्नर : स्पर्धा परीक्षेतील भरतीप्रक्रिया लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी परफेक्ट करिअर अकॅडमीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून पोलीस, रेल्वे, सैन्य दल, एमपीएससी भरतीप्रक्रिया रखडली आहे. दिवस-रात्र मेहनत घेणाऱ्या युवक व युवती भरती प्रक्रियेची प्रतीक्षा करीत आहेत. या तरुणांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी भरतीप्रक्रिया लवकरात लवकर व्हावी यासाठी परफेक्ट करिअर अकॅडमीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

---

अभिषेक कासार यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

सिन्नर : वैद्यकीय परीक्षेतील यशाबद्दल अभिषेक कासार यांचा मिठसागरे ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक भगीरथ चतुर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास बाजार समितीचे माजी संचालक परसराम कथले, शिक्षक नेते आनंदा कांदळकर, डॉ. गंगाधर कासार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिषेक कासार यांनी परराष्ट्रीय वैद्यकीय परीक्षेत देशात अठराव्या, तर राज्यात प्रथम क्रमांकाने यश संपादन केले आहे.

-----

माथाडी कामगारांच्या समस्येसाठी साकडे

सिन्नर : आशा स्वयंसेविका यांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात आशा स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून छावा माथाडी कामगार युनियन यांना संपर्क करण्यात आला. त्यांच्या मागण्या छावा माथाडी कामगार युनियनतर्फे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडण्यात आल्या. टोपे यांनी या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करत मागणी पूर्ण केली. यावेळी छावा माथाडी कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष विलास पांगारकर, छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, प्रदीप बिल्लोरे पाटील, योगेश केवारे, मनोज जरांगे, शत्रुघ्न झुंबड, अतुल पांगारकर, संदीप तिळाणे आदी उपस्थित होते.

---------------------

पीकविमा योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी

सिन्नर : पंतप्रधान पीकविमा योजनेची मुदत वाढविण्याची मागणी हिवरगाव (घंगाळवाडी) येथील शेतकरी सोमनाथ सहाणे यांनी केली आहे. पंतप्रधान पीकविमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची लाभदायक योजना आहे. अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेतात. विमा अर्ज भरण्याची मुदत १५ जुलै आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या झाल्या नाही. ज्यांनी पेरण्या केल्या त्यातील काहींना दुबार पेरण्या करण्याची वेळ आली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्यासाठी अर्जामध्ये पेरणीची तारीख नोंद करावी लागते. शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी लोकप्रतिनिधी व कृषी विभागाने योजनेच्या मुदतवाढीसाठी तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणी सहाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.