शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ खरेदी-विक्री बंदमुळे आवक घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST

पंचवटी : गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम व अटींवर बाजार समिती सुरू करण्यात आली असली तरी, बाजार समितीत ...

पंचवटी : गेल्या आठवड्यापासून रुग्णसंख्या कमी झाल्याने नियम व अटींवर बाजार समिती सुरू करण्यात आली असली तरी, बाजार समितीत किरकोळ शेतमाल विक्रीसाठी व किरकोळ खरेदीसाठी येणाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याने तसेच त्यातच शेतकरी बाजार समितीबाहेर शेतमाल विक्री करत असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक घटल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

बाजार समितीत दैनंदिन ४० टक्के शेतमालाची आवक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने नियमावली जाहीर करून बाजार समितीत किरकोळ खरेदी-विक्री बंद केली आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडत्यांकडे अडकले असल्याने शेतकरी बाजार समितीबाहेर पेठरोड, दिंडोरी रोडवर मेरी रस्ता ठिकाणी भाजीपाला विक्री करत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीबाहेर स्पर्धा नसल्याने व त्यातच शेतकऱ्यांना जागेवर शेतमालाचे पैसे मिळत असल्याने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची विक्री न करता परस्पर बाहेर शेतमालाची विक्री करत आहेत. बाजार समिती सुरू होऊन आठवडा लोटला असला तरी काही निर्बंधांमुळे बाजार समितीत शेतमालाची आवक घटली आहे, असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. अनेक शेतकरी किरकोळ शेतमाल विक्रीला आणतात, त्यात व्यापारी किरकोळ शेतमाल खरेदी करत नसल्याने शेतकऱ्यांवर बाजार समितीबाहेर माल विकण्याची वेळ आली आहे.

इन्फो====

बाजार समिती उत्पन्न घटले

कोरोना पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून बाजार समितीत किरकोळ शेतमाल खरेदी-विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. बाजार समिती बंद करण्यापूर्वी दैनंदिन ३ ते ४ लाख रुपये उत्पन्न मिळायचे, आता केवळ दोन ते सव्वादोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. आठवड्यात बाजार समितीचे अंदाजे १० लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे.