शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नाशिक विभागाचा निकाल २७ टक्के

By admin | Updated: August 25, 2016 00:58 IST

बारावी फे रपरीक्षा : चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण

नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्याच आलेल्या बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेचा नाशिक विभागाचा एकूण निकाल २७.१८ टक्के, तर नाशिक जिल्ह्याचा निकाल २० टक्के लागला आहे. विभागात सर्वाधिक विद्यार्थी नाशिक जिल्ह्यातून परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.फेरपरीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अल्प असल्याचे निकालावरून लक्षात येते. चारही जिल्ह्यांमध्ये परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्णतेचे प्रमाण यामध्ये प्रचंड तफावत असल्याने निकालावर त्याचा परिणाम झाला आहे. अनुत्तीर्ण फेरपरीक्षेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी होता. गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत ३ सप्टेंबरपर्यंत असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी विहित शुल्कासह मंडळाकडे आॅनलाइन निकालाची प्रत किंवा गुणपत्रिकेची सत्य प्रत जोडणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज विभागीय मंडळाच्या कार्यालयात सादर करावा. आठवडाभरात मंडळाकडून महाविद्यालयांना गुणपत्रिका पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर गुणपत्रिका वाटपची तारीख महाविद्यालयांकडून निश्चित केली जाणार आहे. नाशिक विभागाचा निकाल गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी आठ टक्क्यांनी वाढला आहे. मागील वर्षी सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्यात आली होती त्यावेळी नाशिकचा निकाळ १९.९० टक्के इतका लागला होता. नाशिकमध्ये फेरपरीक्षेत केवळ एका विद्यार्थ्याने गैरमार्गाचा अवलंब केला. तर जळगावमध्ये दोन विद्यार्थ्यांनी गैरमार्गाचा अवलंब केला. (प्रतिनिधी)