शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर परिणाम

By admin | Updated: August 9, 2015 23:24 IST

बॅरिकेडिंगची डोकेदुखी : पर्वणीकाळातील तीन दिवस परीक्षेचे

नाशिक : साधुग्रामचे ध्वजारोहण आणि पहिल्या शाहीस्नानाची पर्वणी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे संरक्षणासाठी शहरात उभारण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे स्थानिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याची शक्यता मावळली असून, पर्वणीकाळात इंधनासह दूध आणि इतर वस्तूंचा साठा करणे क्रमप्राप्त झाले आहे. तपोवन, रामकुंड, पंचवटी कारंजा, जुने नाशिक, हनुमानवाडी, रामवाडी, या भागातील नागरिकांना पर्वणीकाळात बॅरिकेड्सचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे. ठिकठिकाणी करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे स्थानिक रहिवाशांवर कोसळलेले पायपिटीचे संकट मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर कमी झाले असले तरी, पुढील कालात ते कायम राहणार आहे. रहिवाशांसाठी प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येत असून, त्यासाठी छायाचित्र आणि आधारकार्डासह वाहनाची कागदपत्रेही मागविली जात आहेत. रामकुंड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, पाथरवट लेन, सरदार चौक, तपोवन या भागातील रहिवाशांचे सर्वाधिक हाल होत आहेत. कारण या परिसरातून बहुतांश रस्ते रामकुंडाकडे येत असल्याने पोलिसांनी या ठिकाणी भाविकांच्या गर्दीच्या नियंत्रणासाठी बॅरिकेडिंग लावून व्यवस्थापन करण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या बॅरिकेडिंगच्या ठिकाणाहून पुढे स्थानिक रहिवाशांनाही सोडले जात नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर पोलीस आयुक्तालयातून त्या नागरिकांसाठी पासेस देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पर्वणीचे तीन दिवस सोडले तर इतर काळात या पासधारकांच्या वाहनांना प्रवेश दिला जाणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे; परंतु अद्याप प्रशासनाने त्यासाठी पासेस न दिल्याने रहिवाशांमध्ये साशंकता कायम आहे. पासेस मिळाल्यानंतरही पर्वणीकाळात तीन दिवस बंद राहणाऱ्या वाहतुकीमुळे रामकुंडाच्या मार्गावर असणाऱ्या सर्वच भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने दोन दिवस आधीच हा साठा करून ठेवावा, असे आवाहनही केले आहे. (प्रतिनिधी)