शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

कर्जमाफीच्या मुद्द्यामुळे समृद्धीच्या दरावर परिणाम

By admin | Updated: June 30, 2017 01:18 IST

जमिनींचे दर जाहीर केल्यास असंतोषात भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील समृद्धीसाठी दर जाहीर करण्यास विलंब केल्याचे वृत्त आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून राज्य सरकारच्या विरोधात अगोदरच शेतकऱ्यांचा रोष कायम असल्याने पुन्हा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी संपादित कराव्या लागणाऱ्या जमिनींचे दर जाहीर केल्यास असंतोषात भर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील समृद्धीसाठी दर जाहीर करण्यास विलंब केल्याचे वृत्त आहे. राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी ठाणे, जालना, नागपूर आदी जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात जमीन खरेदीचे दर शासनाने जाहीर करून जमीनमालक शेतकऱ्यांना खरेदी देण्याचे आवाहन केले आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी या दोन  तालुक्यांतील संपादित करण्यात येणाऱ्या क्षेत्रासाठी जमिनीचे दर अद्यापही घोषित करण्यात आलेले नाहीत. शासकीय यंत्रणा या दर निश्चितीबाबत वेगवेगळे कारणे देत असली तरी, प्रामुख्याने शेतकरी कर्जमुक्तीचे केंद्रबिंदू नाशिक जिल्हा असून, राज्य सरकारने नुकत्याच घोषित केलेल्या सरसकट दीड लाख रुपयांच्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही. विशेष करून द्राक्ष व डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा काहीच फायदा नसल्याचे सांगत शासनाच्या विरोधात वातावरण तयार करण्यात नाशिकचे शेतकरी यशस्वी झाले आहेत. नजिकच्या काळात नाशिकमधूनच पुन्हा सरकार विरोधात आंदोलनाची रणशिंग फुंकले जाणार असल्याने व आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांपैकी समृद्धी महामार्गाचाही विषय समाविष्ट करण्यात आल्याने अशा परिस्थितीत समृद्धीसाठी जमिनीचे दर जाहीर केल्यास शेतकऱ्यांच्या असंतोषात भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी, शेतकऱ्यांना तत्काळ खरिपाचे पीककर्ज हातात देऊन त्यांचा राग शमल्यानंतरच दर निश्चिती केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिक जिल्ह्णातील सिन्नर, इगतपुरी तालुक्यातील क्षेत्राचा विचार करता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दर निश्चितीबाबतची तयारी मात्र पूर्ण करून ठेवली आहे. सध्याच्या शासकीय बाजारभावाच्या चार पट किंवा गेल्या तीन वर्षांत झालेल्या व्यवहारांचा विचार करून एकरी दर निश्चित करून ठेवला आहे. शिवाय शेतकऱ्याच्या जागेतील घर, विहीर, झाडे, पीक आदी मालमत्तेचेही मूल्यांकन करून त्याची भरपाई वेगळी दिली जाणार आहे.