शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

निर्बंध सुरू; पोलीस ॲक्शन मोडवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:15 IST

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बारा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले असून, बुधवारी (दि.१२) ...

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बारा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू केले असून, बुधवारी (दि.१२) दुपारी १२ वाजेपासून त्याच्या अंमलबजावणीला प्रारंभ झाला. त्यापूर्वी सकाळी पुन्हा बाजारपेठेेत अलोट गर्दी झाली होती. दुपारनंतर गर्दी कमी झाली असली तरी सायंकाळी पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि त्यांनी नागरिकांना अडवण्यास सुरुवात केली. उपनगर, सिडको, सातपूरसह काही भागात पोलिसांनी छड्यांचा प्रसाद दिल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले.

जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, बुधवारी (दि. १२) १२ वाजेनंतर कडक निर्बंध लागू होणार असल्याने शहरातील प्रमुख बाजारात विशेषत: रविवार कारंजा, पचंवटी कारंजा, जुने नाशिक, धान्य बाजार या सर्व भागांसह उपनगरात प्रचंड गर्दी सलग दुसऱ्या दिवशी उलटली होती. कडक निर्बंधांची घोषणा असल्याने पोलिसांनीही या गर्दीला रोखले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशीही वावर कायम होता आणि निर्बंध लागू झाल्यानंतरही पोलिसांनी केवळ अनेक भागात मोटारीने फिरून निर्बंध लागू झाल्याने दुकाने बंद करण्यास सांगितले. सायंकाळपर्यंत नागरिकांची गर्दी बऱ्यापैकी कमी झाली असली तरी पोलिसांनी हटकले नव्हते. सायंकाळी मात्र पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना कोठे चालले, अशी विचारणा करून अडवणूक केल्याने अनेकांना माघारी फिरावे लागले, तर उपनगर, सातपूर, सिडकोसह काही भागात रस्त्यावर अकारण भटकणाऱ्या युुवकांना सौम्य छडीमार करीत पोलिसांनी पिटाळून लावले.

इन्फो...

उद्योग बंदच

जिल्ह्यातील उद्योगांमध्ये जर निवासव्यवस्था असेल तरच सुरू ठेवण्याचे आदेश सोमवारी (दि. १०) जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. मात्र, त्यात बदल केला आणि दाेन किलो मीटरच्या आत निवास आणि व्यवस्था असेल, तरीही उद्योग सुरू ठेवता येतील, असे सुधारित आदेश मंगळवारी (दि.११) रात्री दिले, परंतु प्रत्यक्षात इतक्या कमी वेळात अशी व्यवस्था करणे शक्य नसल्याने बहुतांशी उद्योग बंद होते.

इन्फो..

दुपारनंतर बाजार समिती बंद

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी भाजीपाला, फळभाज्यांची आवक जेमतेम राहिली. दुपारी १२ वाजता व्यवहार बंद करण्यात आले. मात्र, त्यानंतर मुंबई येथे १२, गुजरातला आठ, जळगावला तीन, औरंगाबादला दोन, मध्य प्रदेश दोन, उत्तर प्रदेशात दोन अशा एकूण २९ वाहनांद्वारे माल पाठविण्यात आला. आता शेतमाल संकलनासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी करूनही बाजार समित्यांना तत्काळ अशी व्यवस्था करता आली नाही.