शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

विरगाव येथे कायदेविषयक शिबीराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 19:40 IST

विरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.३) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सटाणा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण उपस्थित होते.

ठळक मुद्देकौटुंबिक तसेच सामाजिक स्तरावरील विविध प्रकरणे समझोत्यातून मिटविणे ही काळाची खरीखुरी गरज

विरगाव : येथील ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी (दि.३) कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सटाणा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एस. डी. चव्हाण उपस्थित होते.वर्षानुवर्षे न्यायालयीन पातळीवर चालू असलेली कौटुंबिक तसेच सामाजिक स्तरावरील विविध प्रकरणे समझोत्यातून मिटविणे ही काळाची खरीखुरी गरज असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश चव्हाण यांनी केले. गावपातळीवर उद्भवणारे अनेक वादविवाद व सामाजिक तंटे हे गावपातळीवरच मिटविणे शक्य असून यासाठी गावागावात सामाजिक एकोपा ठेवण्याची गरज आहे. याच प्रकारे वर्षानुवर्षे अनेक प्रलंबित न्यायालयीन खटल्यांचाही समझोत्यातून निपटारा केला जाऊ शकतो असे त्यांनी यावेळी सांगितले. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्राम पंचायतीला कर भरण्याची गरज आहे. मात्र अनेक ग्रामस्थ याकडे सर्रास दुर्लक्ष करतांना दिसून येतात. अश्या थकबाकीदारांना ग्रामपंचायतीने न्यायालयामार्फत नोटीस पाठवून वसुलीची कारवाई करावी असे आवाहनही न्यायाधीश चव्हाण यांनी यावेळी केले. त्यानंतर येथील केबीएच विद्यालय परिसरात मान्यवरांच्या हस्ते पुस्तकवाटप व वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी सह. दिवाणी न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड, वकील पी. पी. भामरे, ए.एल. पाटील, वाय. एच. पाटील, वाय. बी. मोरे, एस. आर. कुलकर्णी, पंचायत समिती विस्तार अधिकारी नितीन देशमुख, सरपंच ज्ञानेश्वर देवरे, उपसरपंच अशोक सोनवणे, एस. टी. देवरे, अशोक देवरे, शांताराम भामरे, जीभाऊ निकम, प्रभाकर देवरे, चिंतामण आहिरे, हेमंत गांगुर्डे, विनायक बच्छाव, हेमंत देवरे, पोलीस पाटील अशोक पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.