शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवू

By admin | Updated: March 21, 2017 00:02 IST

दिलीप स्वामी : गिरणा उजवा कालवा कृती समितीचे आंदोलन स्थगित

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांना पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यास पाणी सोडावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथे जलकुंभावर चढून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाइल आंदोलन केले होते. उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. असे असले तरी भविष्यात सौंदाणेसह अकरा गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनल्यानंतर समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे.पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्याद्वारे सौंदाणे, टाकळी, सोनज, नांदगाव, मुंगसे, वाके, मांजरे, शिरसोंडी, कौळाणे, नगाव, वऱ्हाणे या गावांना पिण्याचे पाणी पुरवावे या मागणीसाठी गिरणा आरक्षण कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांताधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली होती. प्रांताधिकारी मोरे यांच्या पाहणीनंतर गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी सोडल्यानंतर केवळ सदरचे पाणी सौंदाणे गावापर्यंतच आले. उर्वरित पुढील नऊ गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथील जलकुंभावर चढून शोले स्टाइलने आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदारांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती निष्फळ ठरली. अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पाण्याचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)