शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पाणी आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवू

By admin | Updated: March 21, 2017 00:02 IST

दिलीप स्वामी : गिरणा उजवा कालवा कृती समितीचे आंदोलन स्थगित

मालेगाव : तालुक्यातील सौंदाणेसह अकरा गावांना पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्यास पाणी सोडावे, या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथे जलकुंभावर चढून कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शोले स्टाइल आंदोलन केले होते. उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पिण्याच्या पाण्याचे आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. असे असले तरी भविष्यात सौंदाणेसह अकरा गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनल्यानंतर समिती आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत दिसून येत आहे.पुनंद धरणातून गिरणा उजव्या कालव्याद्वारे सौंदाणे, टाकळी, सोनज, नांदगाव, मुंगसे, वाके, मांजरे, शिरसोंडी, कौळाणे, नगाव, वऱ्हाणे या गावांना पिण्याचे पाणी पुरवावे या मागणीसाठी गिरणा आरक्षण कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली होती. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, प्रांताधिकारी अजय मोरे यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांनी टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली होती. प्रांताधिकारी मोरे यांच्या पाहणीनंतर गिरणा उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले होते. मात्र पाणी सोडल्यानंतर केवळ सदरचे पाणी सौंदाणे गावापर्यंतच आले. उर्वरित पुढील नऊ गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्यामुळे संतप्त झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून तालुक्यातील कौळाणे येथील जलकुंभावर चढून शोले स्टाइलने आंदोलन सुरू केले होते. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली. तहसीलदारांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती निष्फळ ठरली. अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी आंदोलनकर्त्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून उर्वरित नऊ गावांना प्राधान्यक्रमाने पाण्याचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. (प्रतिनिधी)