शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

छटपूजेतून गोदा स्वच्छता संवर्धनाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 00:34 IST

उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड आदी राज्य तसेच नेपाळमधील काही भागातून नाशिक शहरात रोजगार व उद्योग-व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा सण तथा उत्सव गुरुवारी (दि. २६) गोदा घाटावर साजरा होत आहे. या छटपर्वानिमित्त आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करण्याबरोबर गोदा स्वच्छता व संवर्धनाचाही संकल्प करण्यात येईल. त्यासाठी छटपूजेनंतर स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येणार आहे.

नाशिक : उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड आदी राज्य तसेच नेपाळमधील काही भागातून नाशिक शहरात रोजगार व उद्योग-व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांचा महत्त्वाचा मानला जाणारा छटपूजा सण तथा उत्सव गुरुवारी (दि. २६) गोदा घाटावर साजरा होत आहे. या छटपर्वानिमित्त आपल्या परिवाराच्या सुख-समृद्धीची प्रार्थना करण्याबरोबर गोदा स्वच्छता व संवर्धनाचाही संकल्प करण्यात येईल. त्यासाठी छटपूजेनंतर स्वच्छता मोहीमदेखील राबविण्यात येणार आहे.  दिवाळी सणानंतर लगेच चार-पाच दिवसांनी येणाºया छटपर्वात उत्तर भारतात वाराणसी येथे गंगाघाटावर गंगा संवर्धनाचा संकल्प राबविण्यात येत आहे. अशाच प्रकारचा संकल्प करीत मोशी येथे इंद्रायणीच्या घाटावरदेखील नदी स्वच्छतेची मोहीम राबविण्यात येणार आहे. याच प्रकारचा संकल्प गोदा घाटावर जमणाºया उत्तर भारतीय भाविकांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  छटपर्व किंवा छटपूजा हा सण तथा उत्सव कार्तिक शुक्ल पक्षाच्या षष्ठीला साजरा करण्यात येतो. सूर्योपासनेसाठी साजºया होणाºया या लोकोत्सवात उत्तर भारतातील बिहार, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेशाचा काही भाग, नेपाळमधील तराई क्षेत्रात हा लोकोत्सव साजरा करण्यात येतो. उत्तर भारतीय समाजात छटपूजेला लोकआस्थेचे महापर्व समजले जाते. कार्तिक शुक्ल षष्ठीला सर्व उत्तर भारतीय कुटुंब नदीकिनारी येऊन सूर्याची उपासना करतात. चार दिवस चालणाºया या सणाला पहिल्या दिवशी भात आणि भोपळ्याची भाजी सेवन करून दुसºया दिवशी उपवासाला प्रारंभ होतो. दिवसभर अन्नत्याग करून सायंकाळी ७ वाजता खीर करून पूजेनंतर प्रसाद म्हणून त्याचे सेवन करण्यात येते, यालाच ‘खरना’ असेही म्हणतात. त्यानंतर तिसºया दिवशी मावळत्या सूर्याला दुधाचे अर्घ्य अर्पण करून चौथ्या दिवशी उगवत्या सूर्याला अर्घ्य देऊन उपवास सोडण्यात येतो. या सण-उत्सवात सूर्याेपासनेचे महत्त्व असून, पुराणग्रंथात या पूजेचा उल्लेख आहे. या पूजेसाठी नदीच्या घाटावर सर्व महिला एकत्र जमून तीन, पाच किंवा सात उसाची झोपडी करून  त्यात सूप किंवा परडीत पूजेचे साहित्य, दूध, फळे मांडून सूर्य, नदी  आणि देवदेवतांची पूजा करतात. यानिमित्त आरती व भक्तिगीतेही म्हटली जातात. गोदाघाटावर गांधी तलावानजीक गुरुवारी (दि. २६) नाशिकस्थित उत्तर भारतीय विशेषत: बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशातील काही भागातील आणि नेपाळमधील काही प्रांतातील स्त्री-पुरुष एकत्र येऊन ही छटपूजा करणार आहेत. यावेळी गोदावरी नदीचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, तसेच छटपर्वानंतर दुसºया दिवशी गोदाघाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल, असे उत्तर भारतीय समाजबांधवांनी सांगितले.वर्षातून दोनवेळा येते छटपर्वछटपर्व वर्षातून दोनवेळा साजरे होते. चैत्र शुक्ल पक्षातील षष्ठीला चैतीछट तर कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठीला कार्तिक छट म्हटले जाते. स्त्री-पुरुष दोघेही हा सण साजरा करतात. विशेषत: परिवाराच्या सुख-समृद्धीसाठी आणि मनोकामनापूर्तीसाठी महिला या सणाला व्रत करतात. पुत्रप्राप्ती, परिवाराला आरोग्य व सुखशांती लाभावी म्हणून छट पर्वाचे व्रत महिला करतात.