शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मतदान मतपत्रिकेवर घेण्याचा वडांगळी ग्रामसभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:40 IST

सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर करायचा असेल तर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनऐवजी पुन्हा मतपत्रिेकवर घ्यावी, असा ठराव ग्रामसभेत मांडला. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अशी मागणी जिल्ह्यात प्रथमच सामान्य मतदारांनी ग्रामसभेद्वारे केली आहे.

सरपंच सुवर्णा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मांडण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच किशोर खुळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे, शरद खुळे, विनायक खुळे, सुनीता सैद, संगीता आढांगळे, वंदना सूर्यवंशी, उत्तम खुळे, अमित भावसार आदी उपस्थित होते. नितीन खुळे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र दुसऱ्या बाजूला ईव्हीएम बाबतच्या उलट-सुलट चर्चा थांबत नाही. ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करणेही महत्वाचे नाही. मात्र समाजात निवडणुकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा संशयी वातावरणामुळे लोकशाही नाजूक वळणावर पोहचून धोक्यात येऊ शकते. त्यासाठी निवडणुका या निकोप व नि:संशयी वातावरणात पार पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाहीवरील सामान्य जनतेचा विश्वास दृढ करायचा असेल तर निवडणूका या मतिपत्रकेवर घेण्यात याव्यात, असा ठराव नितीन खुळे यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी विकास संस्थेचे माजी अध्यक्ष सचिन खुळे, बाळासाहेब खुळे, योगेश घोटेकर, राजेंद्र अहिरे, प्रमोद आढांगळे, रामनाथ कांदळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक