शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मतदान मतपत्रिकेवर घेण्याचा वडांगळी ग्रामसभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 18:40 IST

सिन्नर : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मात्र असे असतानाही भाजपच्या विजयाचा ग्रामीण भागात जल्लोष नाही. ईव्हीएम बद्दल अनेक उलट-सुलट बातम्या येत आहेत. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात लोकशाहीवरच संशय निर्माण होऊ लागला आहे. हा संशय दूर करायचा असेल तर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया ईव्हीएम मशीनऐवजी पुन्हा मतपत्रिेकवर घ्यावी, असा ठराव ग्रामसभेत मांडला. राजकीय पक्षांव्यतिरिक्त अशी मागणी जिल्ह्यात प्रथमच सामान्य मतदारांनी ग्रामसभेद्वारे केली आहे.

सरपंच सुवर्णा कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मांडण्यात आला. व्यासपीठावर पंचायत समितीचे माजी सदस्य रामदास खुळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सुदेश खुळे, उपसरपंच किशोर खुळे, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब खुळे, शरद खुळे, विनायक खुळे, सुनीता सैद, संगीता आढांगळे, वंदना सूर्यवंशी, उत्तम खुळे, अमित भावसार आदी उपस्थित होते. नितीन खुळे यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. मात्र दुसऱ्या बाजूला ईव्हीएम बाबतच्या उलट-सुलट चर्चा थांबत नाही. ईव्हीएमबाबत संशय व्यक्त करणेही महत्वाचे नाही. मात्र समाजात निवडणुकांबाबत संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. अशा संशयी वातावरणामुळे लोकशाही नाजूक वळणावर पोहचून धोक्यात येऊ शकते. त्यासाठी निवडणुका या निकोप व नि:संशयी वातावरणात पार पाडणे गरजेचे आहे. त्यामुळे लोकशाहीवरील सामान्य जनतेचा विश्वास दृढ करायचा असेल तर निवडणूका या मतिपत्रकेवर घेण्यात याव्यात, असा ठराव नितीन खुळे यांनी मांडला त्यास सर्वांनी अनुमोदन दिले. यावेळी विकास संस्थेचे माजी अध्यक्ष सचिन खुळे, बाळासाहेब खुळे, योगेश घोटेकर, राजेंद्र अहिरे, प्रमोद आढांगळे, रामनाथ कांदळकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक