शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

हस्तांतरणास भाजपातच विरोध

By admin | Updated: June 1, 2017 01:39 IST

नाशिक : त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या दोन राज्यमार्गांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी या दोन राज्यमार्गांचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, सत्ताधारी भाजपातून विरोधाचा सूर उमटू लागला आहे. महापौर रंजना भानसी यांनीही मद्यविक्री दुकानांविरोधात आपली भूमिका स्पष्ट करत शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर शिवसेनेनेही आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शविला आहे. शहरातून जाणारा डहाणू-त्र्यंबक-नाशिक हा ८ कि.मी. लांबीचा तसेच नाशिक-दिंडोरी-वणी हा १०.७५० कि.मी. लांबीचा राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत (डिनोटिफाईड) करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे त्र्यंबक मार्गावरील सुमारे २५, तर दिंडोरी मार्गावरील सुमारे नऊ मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू होणार आहेत. शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पाचशे मीटर अंतरावर असलेली मद्यविक्रीची दुकाने वाचविण्यासाठीच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन्ही राज्यमार्ग अवर्गीकृत करण्याची तत्परता दाखविली गेली आहे. शासनाच्या या निर्णयाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपातूनच या निर्णयाला विरोध केला जात आहे. महापौर रंजना भानसी यांनी आपण जनतेसोबत असून, मद्यविक्रीच्या दुकानांना विरोध असल्याचे स्पष्ट केले. महापालिकेचा विरोध असलेला प्रस्तावही शासनाला पाठविला जाणार असून, त्याबाबत शहराध्यक्षांसह पालकमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे महापौरांनी सांगितले. भाजपाचे नगरसेवक व मनपातील सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही राज्यमार्गांच्या अवर्गीकृत प्रकरणात विरोध दर्शविला. सातपूर विभागातील आठ नगरसेवकांनी यापूर्वीच राज्यमार्ग महापालिकेकडे अवर्गीकृत करण्यास विरोध केलेला असून, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. याबाबत पुन्हा एकदा आयुक्तांसह महापौरांची भेट घेऊन निवेदन दिले जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. निर्णयाविरोधी शिवसेनेने सुद्धा आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनी सांगितले, शासनाने परस्पर घेतलेला हा निर्णय धक्कादायक आहे. केवळ दारू दुकानदारांचे हित डोळ्यासमोर ठेवत सरकारने हा निर्णय घेण्याची तत्परता दाखविली आहे. मुख्यमंत्र्यांकडून दत्तक घेतलेल्या नाशिकला भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती परंतु मद्यविक्रेते आणि तळीरामांची बाजू घेत कोट्यवधींचा खर्च मनपाच्या पदरात टाकण्याचे काम त्यांनी केले आहे. महापालिका आयुक्तांची याप्रश्नी भेट घेऊन चर्चा करणार असून, जळगाव महापालिका आयुक्तांनी घेतलेली भूमिका नाशिकच्या आयुक्तांनीही घ्यावी, अशी विनंती करणार आहोत. शासनाने सदरचा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशाराही बोरस्ते यांनी दिला आहे.