शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महामार्गापलीकडील रहिवासी सापडले कोंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:14 IST

ओझर : येथील मुंबई - आग्रा महामार्गापलीकडे राहणाऱ्या अनेक वस्त्यांना ओझर गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच नसल्याने त्यांनी महामार्ग प्रशासनाकडे ...

ओझर : येथील मुंबई - आग्रा महामार्गापलीकडे राहणाऱ्या अनेक वस्त्यांना ओझर गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ताच नसल्याने त्यांनी महामार्ग प्रशासनाकडे निवेदन देत पर्यायी रस्त्याची मागणी केली आहे.

येथील मुंबई - आग्रा महामार्गावर सायखेडा फाटा चौफुलीवर तसेच शिवले कॉम्प्लेक्स ते गडाख कॉर्नर व तेथून धन्वंतरी हॉस्पिटलपर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दरम्यान, हे पूल एकमेकांना जोडण्याचे देखील काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु महामार्ग पलीकडील पंचशील नगर, नवघिरे मळा, जगझाप मळा, कदम मळा, महादेव मंदिर परिसर व गाडेकरवाडी या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे. या सगळ्या वस्त्यांमधून ओझर गावात जाणारा रस्ता उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे बंद झाला असल्याने गावात जाण्यासाठी पर्यायी रस्ता नाही. त्यामुळे पायी जाणाऱ्या व्यक्तीला जीव मुठीत धरून महामार्ग ओलांडून जावे लागेल. त्यामुळे अपघात घडण्याची तिथे दाट शक्यता आहे. तसेच वाहनधारकांना गावात जाण्यासाठी जवळपास अर्धा किलोमीटर लांबून गडाख कॉर्नर किंवा सायखेडा फाटा चौफुलीवरून वळसा घालून जावे लागेल. या वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक हे बहुतांशी कामगार असल्याने सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी घाईघाईने जाऊन अपघात ओढवू न घ्यायची शक्यता आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने जनभावना व गरज लक्षात घेत महामार्गवरून जाण्यासाठी पर्यायी रस्ता करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांतर्फे देण्यात आला आहे.

------------------

विद्यार्थ्यांचाही जीव धोक्यात

मुंबई - आग्रा महामार्गाला लागूनच दोन माध्यमिक व एक प्राथमिक शाळा आहे. तिन्ही शाळांचे मिळून जवळपास तीन साडेतीन हजार विद्यार्थी आहेत. शाळेत येण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना महामार्गाचा वापर करावा लागतो. नेहमीच बसची वाट बघत रस्त्यावर उभे रहावे लागते. भरधाव येणाऱ्या गाड्यांमुळे येथे अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालक, नागरिकांसोबतच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात राहणार आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी नंतर हा प्रश्न उद्भवणारच आहे.

--------------------

पंचशील नगर व महादेव मठात राहणारे लोक हे शेतकरी व मजुरी करणारे आहेत. यामुळे सकाळी गावात जाताना पर्यायी रस्ता नसल्याने महामार्ग ओलांडून जावे लागेल. एखादा अपघात घडला तर त्यास जबाबदार कोण राहील? आम्हांला लवकरात लवकर पर्यायी रस्ता करून द्यावा, नाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल.

-प्रकाश महाले, माजी उपसरपंच ओझर.

--------------

मळ्यातून एखादा अत्यवस्थ रुग्ण गावातील हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा असल्यास त्याला घेऊन येताना अर्धा किलोमीटर लांबून फिरून न्यावे लागेल. तसेच एखाद्या मृत व्यक्तीला गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी नेताना मोठी कसरत करीत न्यावे लागेल. या सर्व गोष्टींचा विचार करून महामार्ग प्राधिकरण विभागाने याची दखल घेत पर्यायी रस्ता करून द्यावा.

- भूषण कदम, स्थानिक रहिवासी (२७ ओझर)

===Photopath===

270321\27nsk_22_27032021_13.jpg

===Caption===

२७ ओझर