शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
3
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
4
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
5
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
6
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
7
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"
8
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
9
Astro Tips: गृहलक्ष्मीला सुखी ठेवा, भाग्यलक्ष्मी आपसुख होईल प्रसन्न; जाणून घ्या परस्परसंबंध!
10
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
11
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
12
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
13
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
14
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
15
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
16
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
17
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
18
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
19
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
20
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!

आयुर्वेदामधील आरक्षण डावलण्याचा घाट

By admin | Updated: May 11, 2015 00:46 IST

आरोग्य विद्यापीठ; आयुर्वेद संचालनालयाचेही दुर्लक्ष

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमधील अध्यापकपदाची भरती करताना संबंधित संस्थाचालक आरक्षण डावलण्याचा प्रकार करीत असल्याची बाब समोर आली आहे. शासनाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून अध्यापकपदांची खैरात खुल्या प्रवर्गासाठी करीत असल्याचा आरोप काही जागृक प्राध्यापकांनी केला आहे .आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक पदे भरती करताना आरोग्य विद्यापीठाची रितसर मान्यता घ्यावी लागते. विद्यापीठाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या निर्देशाची अंमलबजावणी करावी लागते. शिक्षक पद भरतीवर आयुर्वेद संचालक, आयुर्वेद विभाग यांचेदेखील लक्ष असते. आयुर्वेद व युनानी महाविद्यालयामधील संवर्गानुसार शिक्षकांची एकूण ११२ रिक्त पदे भरण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यासाठी शासनाने एक परिपत्रकही काढले होते. राहिलेला अनुशेष रोस्टरनुसार भरण्याचे निर्देश शासनाने दिले होते. हे पत्रक सर्वच अकृषिक विद्यापीठांनाही लागू होते. त्यानुसार आरोग्य विद्यापीठाने संबंधित आयुर्वेद आणि युनानी महाविद्यालयांना रोस्टर भरण्याचे आदेश दिले होते; परंतु संस्थाचालकांनी सदर निर्णय हा शासनाच्या सामन्य प्रशासन विभागाचा असून, तो आयुर्वेद महाविद्यालयांना लागू होत नसल्याचे सांगून पूर्वीच्या पद्धतीनुसारच भरती करण्याची भूमिका घेतली होती. त्यानुसार जी पदे एकाकी आहेत त्यांना आरक्षण लागू होत नाही अशी भूमिका या संस्थाचालकांनी घेऊन आरक्षणानुसार पदे भरण्यास नकार दिला आहे. असे करताना या संस्थांनी आणि विद्यापीठानेही एकाकी पद या संज्ञेचा चुकीचा अर्थ लावला असा आरोप आयुर्वेद आणि युनानी शाखेच्या शिक्षकांनी केला आहे. ज्या पदाला सहायक पद नसते आणि ज्या पदाला पदोन्नती नसते अशा पदाला एकाकी पद म्हटले गेले आहे. असे असतानाही आयुर्वेद महाविद्यालयांनी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक ही पदे भरताना पदांची संख्या केवळ एकच असेल तर आरक्षण लागू होत नाही असा चुकीचा अर्थ काढला आहे. वास्तविक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक ही पदे पदोन्नतीने भरली जात असतानाही संस्थाचालक आणि विद्यापीठानेही एकाकी (आयसोलेटेड)बाबत चुकीचा अर्थ लावला आहे. यामुळे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक ही पदे सरळ सरळ खुल्या प्रवर्गातून भरली जात आहे. वास्तविक हा सारा प्रकार संस्थाचालक, विद्यापीठ आणि आयुर्वेद संचालक यांना ज्ञात असतानाही केवळ जाणूनबुजून आरक्षण डावलण्यासाठीच परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.