शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

५०० रेल्वे प्रवाशांचे आरक्षण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:14 IST

नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे दररोज एकूण ६० रेल्वे ये-जा करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी ...

नाशिकरोड रेल्वे स्थानक मार्गे दररोज एकूण ६० रेल्वे ये-जा करतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी दोन, तीन जादा रेल्वे सोडल्या जातात. नाशिकरोड रेल्वे स्थानक येथून सध्याच्या स्थितीला दररोज २० ते २५ हजार प्रवासी ये-जा करतात. लांब पल्ल्याच्या रेल्वेचे आरक्षण तिकीट मिळत नसल्याने काही प्रवासी चोर मार्गाने रेल्वे स्थानकात प्रवेश करून रेल्वेने प्रवास करीत आहेत.

आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी

गेल्या आठ दिवसापासून राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने तसेच शासकीय कार्यालयात उपस्थितीबाबत निर्बंध घातल्याने दररोज नाशिकहून मुंबई, ठाण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. लाॅकडाऊनमुळे विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांनी आपले आरक्षण रद्द करण्यासाठी गर्दी केली आहे. राज्याच्या राज्यात विविध भागात जाण्यासाठी रेल्वेचे आरक्षित केलेले तिकीट लाॅकडाऊनमुळे रद्द करण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली आहे. गेल्या आठ दिवसात ५०० हून अधिक आरक्षण तिकीट रद्द झाले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे भविष्यात लाॅकडाऊन वाढण्याच्या शक्यतेमुळे मे महिन्यात सुटीनिमित्त बाहेरगावी फिरायला जाण्याचे नियोजन केलेल्यांपैकी अनेकांनी आपले आरक्षण रेल्वे तिकीट रद्द केले आहे.

प्रतिक्रिया====

मुंबईहून सुटणाऱ्या नाशिकरोड मार्गे परराज्यात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या सर्वच रेल्वेला नेहमीच हाऊसफुल्ल गर्दी असते. त्या रेल्वेमध्ये नाशिकरोडहून बसणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र लाॅकडाऊनमुळे व राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधामुळे पंचवटी, राजधानी या दोन रेल्वेची गर्दी ओसरली आहे. तसेच विदर्भात जाणाऱ्या रेल्वेलादेखील गर्दी कमी झाली आहे. लाॅकडाऊनमुळे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र ज्याच्याकडे आरक्षण तिकीट आहे त्यालाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जात आहे.

आर. के. कुठार

नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधक