शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
4
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
5
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
6
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
7
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
8
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
9
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
10
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
11
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
12
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
13
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
14
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
15
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
16
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
17
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
18
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
19
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
20
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!

‘रिपाइं’च्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: October 10, 2016 01:51 IST

कठोर शिक्षा द्या : जातीयवादी रंग दिला जात असल्याचा आरोप

नाशिक : तळेगावमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ‘या घटनेमधील संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, मात्र घटनेचे भांडवल करून त्यास जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असल्याचे गाऱ्हाणे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले.जिल्ह्यात तळेगावच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको करून आंदोलकांनी निषेध केला; मात्र यावेळी काही समाजकंटकांनी परिवहन महामंडळांच्या बसेसपासून पोलीस वाहने आणि निरपराध नागरिकांनाही लक्ष्य केले. गावपातळीवरील पूर्ववैमनस्यांमधून विनाकारण काही नागरिकांच्या घरांना व वाहनांना समाजकंटक लक्ष्य करीत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने महाजन यांच्याशी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस बळ अपुरे पडत असून, जे पोलीस आहे ते बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र एकाही समाजकंटकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. त्याची फलनिष्पत्ती तणावामध्ये झाली. पोलिसांनी वेळीच समाजकंटकांना आवरले असते तर कदाचित जिल्ह्यात रान पेटले नसते, असाही आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस संरक्षण द्यावे, समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक सत्र राबवावे, कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नये, अशा मागण्या निवदेनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ‘रिपाइं’चे कार्यकर्ते सीबीएस येथील उद्यानासमोर एकत्र आले. तेथून घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने मोर्चा काढला. मोर्चा त्र्यंबकनाका, गडकरी चौकातून रात्री आठ वाजेच्या सुमारास विश्रामगृहावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आठ ते दहा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला व निवेदन दिले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)