शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

‘रिपाइं’च्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: October 10, 2016 01:51 IST

कठोर शिक्षा द्या : जातीयवादी रंग दिला जात असल्याचा आरोप

नाशिक : तळेगावमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. ‘या घटनेमधील संशयिताला कठोर शिक्षा व्हावी, मात्र घटनेचे भांडवल करून त्यास जातीयवादी रंग देण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करत असल्याचे गाऱ्हाणे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले.जिल्ह्यात तळेगावच्या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ठिकठिकाणी रास्ता रोको करून आंदोलकांनी निषेध केला; मात्र यावेळी काही समाजकंटकांनी परिवहन महामंडळांच्या बसेसपासून पोलीस वाहने आणि निरपराध नागरिकांनाही लक्ष्य केले. गावपातळीवरील पूर्ववैमनस्यांमधून विनाकारण काही नागरिकांच्या घरांना व वाहनांना समाजकंटक लक्ष्य करीत असल्याचा आरोप यावेळी शिष्टमंडळाने महाजन यांच्याशी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस बळ अपुरे पडत असून, जे पोलीस आहे ते बघ्याची भूमिका घेत आहे. मात्र एकाही समाजकंटकाला पोलिसांकडून अटक करण्यात आली नाही. त्याची फलनिष्पत्ती तणावामध्ये झाली. पोलिसांनी वेळीच समाजकंटकांना आवरले असते तर कदाचित जिल्ह्यात रान पेटले नसते, असाही आरोप यावेळी पदाधिकाऱ्यांनी बोलताना केला. गावपातळीवर पोलीस संरक्षण द्यावे, समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी अटक सत्र राबवावे, कायदा हातात घेणाऱ्यांची गय करू नये, अशा मागण्या निवदेनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ‘रिपाइं’चे कार्यकर्ते सीबीएस येथील उद्यानासमोर एकत्र आले. तेथून घोषणाबाजी करत सर्व कार्यकर्त्यांनी शासकीय विश्रामगृहाच्या दिशेने मोर्चा काढला. मोर्चा त्र्यंबकनाका, गडकरी चौकातून रात्री आठ वाजेच्या सुमारास विश्रामगृहावर येऊन धडकला. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आठ ते दहा पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांची भेट घेऊन सर्व प्रकार कथन केला व निवेदन दिले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाजन यांनी शिष्टमंडळाला दिले. (प्रतिनिधी)