शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑ प्रजासत्ताक, पण भांडवलदारांच्या सोयीचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:30 IST

नाशिक : देशाने प्रजासत्ताक राज्य घटना स्वीकारून ६८ वर्षे झाली. देशाच्या विकासाचा वारूही चौफेर उधळला. परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, जातीय आणि राजकीय घडामोडींमधील बदलामुळे अनेकदा शंका निर्माण झाल्या.

ठळक मुद्देतरुणाई मात्र स्पष्ट बोलणारी डिजिटल ग्राम करण्याचा संकल्प

नाशिक : देशाने प्रजासत्ताक राज्य घटना स्वीकारून ६८ वर्षे झाली. देशाच्या विकासाचा वारूही चौफेर उधळला. परंतु त्याचबरोबर देशातील सामाजिक, जातीय आणि राजकीय घडामोडींमधील बदलामुळे अनेकदा शंका निर्माण झाल्या. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही हवीच किंंबहुना प्रजासत्ताक घटना चिरायुच असेल असा विश्वास सर्वांच्या मनात असला तरी प्रजेला त्यांच्या अधिकारांचा कितपत उपयोग होतो यासह विविध प्रश्नांबाबत तरुणाई मात्र स्पष्ट बोलणारी आहे. ‘लोकमत’ने केलेल्या सर्र्वेक्षणात तरुणाईने देशात प्रजासत्ताक आहे, परंतु खरी सत्ता भांडवलदार आणि त्याखालोखाल राजकारण्यांच्या हाती आहे, अशा भावना व्यक्त केल्या. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असली तरी हे स्वातंत्र्य घटनेने दिले असून ते अबादीतच आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले.देशातील सध्याच्या व्यवस्थेबद्दल वेगळेच वातावरण तयार होत आहे. विचारवंतांची मतमतांतरे काही असली तरी या देशातील सामान्य तरुणाला काय वाटते हे महत्त्वाचे आहे. त्यातच भारतात सध्या तरुणांची संख्या सर्वाधिक आहे, त्यामुळे नव्या पिढीच्या आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे टेक्नोसेव्ही असलेल्या तरुणाईला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी लोकमतने विविध महाविद्यालयांतील शंभर युवकांकडून प्रश्नावली भरून घेतली, त्याआधारे निष्कर्ष काढला असता या देशात काहीही झाले तरी युवकांना देशात भवितव्य असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले. देशात सध्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, शहरात स्मार्ट सिटी सोडाच परंतु ग्रामीण भागातही डिजिटल ग्राम करण्याचा सरकारचा संकल्प आहे. देशातील शहरी-ग्रामीण व्यवस्था, आर्थिकस्तर, साक्षरता या सर्वच बाबी तपासल्या तर देशात डिजिटल क्रांती होण्यास अडचण नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.जगात सर्वाधिक तरुणांची संख्या भारतात आहे. त्यामुळे भारताची तरुणांचा देश म्हणून ओळख असली तरी सध्या तरुणांसमोर रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. ही स्थिती सुधारण्याची गरज आहे. परंतु, सरकारकडून घेतल्या गेलेल्या आर्थिक निर्णयामुळे शेती क्षेत्रासह उद्योग व्यवसायांवरही विपरीत परिणाम झाल्याने त्याचा या देशातील कोट्यवधी तरुणाच्या भविष्यावर परिणाम झाल्याची प्रतिक्रिया नाशिकमधील तरुणांनी व्यक्त केल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून क्रांती घडवणे शक्य असल्याची प्रतिक्रिया व्यक्त तरुणांनी त्यासाठी सकारत्मक दृष्टिकोन बाळगून दीर्घकाळ काम करण्याची गरज व्यक्त केली.आपल्या देशातील तरुणांचे देशावर नक्कीच प्रेम आहे. देशाचे स्वातंत्र्य किती मोलाचे आहे हे इतिहासात डोकावताना तर समजतेच पण रोज प्रसारमाध्यमातून देशाच्या सीमांवर अतिरेक्यांशी, दहशतवाद्यांशी सामना करताना शहीद झालेल्या वीरांच्या बातम्या वाचून, ऐकूनही अधोरेखित होते. पण राजकारणी लोक आणि पैशाच्या हव्यासापाई नागरिक ज्या चुकीच्या गोष्टी करत आहेत त्याचा तरुणाईला खूप राग येतो. त्यामुळे त्यांना दुसरे देश बरे वाटतात. डिजिटल इंडियाबाबत तरुणाई आशादायी आहे पण त्याचवेळी सायबर गुन्हेगारीचीही या तरुणाईला चिंता वाटते.