शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सेना-रिपाइं गटनोंदणी प्रस्ताव फेटाळला

By admin | Updated: March 28, 2017 00:53 IST

नाशिक : शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केलेली असल्याने रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नसल्याचा निर्णय विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला.

नाशिक : शिवसेनेने यापूर्वीच गटनोंदणी केलेली असल्याने रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नसल्याचा निर्णय विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिल्याने महापालिकेच्या स्थायी समितीवर भाजपाचा सभापतिपद विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेनेने विभागीय आयुक्तांच्या या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करत उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेत भाजपा- ६६, शिवसेना- ३५, कॉँग्रेस- ६, राष्ट्रवादी- ६, मनसे- ५, अपक्ष- ३ आणि रिपाइं- १ असे पक्षीय बलाबल आहे. त्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेसोबत प्रत्येकी एक अपक्ष जात एकत्रित गटनोंदणी केलेली आहे, तर रिपाइंने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेत एकत्रित गटनोंदणी करण्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे १४ मार्च रोजी सादर केला होता. मात्र, शिवसेनेने अगोदरच स्वतंत्र ३५ सदस्यांची गटनोंदणी केलेली असल्याने पुन्हा रिपाइंसोबत गटनोंदणीची पुनरुक्ती करता येणार नाही, असा निर्णय देणारे पत्र विभागीय आयुक्तांनी शिवसेना गटनेता विलास शिंदे यांना सोमवारी (दि.२७) दिले आहे.  विभागीय आयुक्तांनी सेना-रिपाइंचा एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने तौलनिक संख्याबळात आता सेनेचे ३५ सदस्यच मोजले जातील. सेना-रिपाइंची एकत्रित गटनोंदणी झाली असती तर स्थायी समितीवर भाजपा- ८, शिवसेना- ५, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचे प्रत्येकी एक सदस्य नियुक्त होऊ शकले असते आणि स्थायीवर ८-८ संख्याबळ होऊन चिठ्ठी पद्धतीने सभापतिपदाची निवड करावी लागली असती. परंतु, विभागीय आयुक्तांनी एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने आता स्थायीवर भाजपा- ९, शिवसेना- ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे यांचे प्रत्येकी एक याप्रमाणे सदस्य नियुक्त होणार आहेत. परिणामी, स्थायीवर भाजपाचे स्पष्ट बहुमत होऊन सभापती निवडला जाणार आहे. (प्रतिनिधी)प्रत मात्र आघाडीच्या नावानेविभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दिलेल्या निर्णयाच्या प्रतीवर दि. २४ मार्च ही तारीख टाकलेली आहे आणि खाली प्रत म्हणून विलास शिंदे यांचे नाव टाकताना त्यांच्यापुढे पद म्हणून मात्र गटनेता, शिवसेना-रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) महानगरपालिका आघाडी, नाशिक असा उल्लेख केला आहे. त्यामुळे एकप्रकारे विभागीय आयुक्तांनी महापालिकेत सेना-रिपाइंची आघाडी मान्यच केल्याचे म्हटले जात आहे.