शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा संपुष्टात : सिन्नर शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. येत्या आठ दिवसात दारणा नदीपात्रात पाण्याचे आर्वतन न सुटल्यास कधी नव्हे एवढ्या पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ सिन्नरकरांसह टॅँकरने पाणीपुरवठा होणाºया गावांवर येणार आहे.सिन्नर शहरास दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने इंटेक विहिरीत पाणी येत नाही. त्यामुळे नदीपात्रात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी विद्युत जलपंप टाकून ते एका मोठ्या खड्ड्यात जमा करून त्याचा उपसा करण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. जवळच्या खड्ड्यातील पाणी एकत्र करून उपसा करत जास्तीत जास्त सात दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी नदीपात्रात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. जी अवस्था नगर परिषदेची आहे तीच अवस्था एमआयडीसी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसी, भगूर नगर परिषद, देवळाली कॅम्प व नाशिकरोडच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाचही जणांनी दारणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पाणीसाठा लवकर संपल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नियोजित आवर्तन मे महिन्यात असताना एप्रिलमध्येच पाणी संपल्याने अवैध पाणी उपशाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.सिन्नर शहराला केवळ सात दिवस पाणी पुरेल इतके पाणी कसेबसे उपलब्ध केले जात आहे. आवर्तन न सुटल्यास टंचाई वाढणार आहे. खासगी टॅँकरचालकांची बैठक घेऊन कोणत्या विहिरींतून पाणी उपलब्ध करून घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. दारणा धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन सुटत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन आहे. सिन्नरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह सहकार्य करावे.-व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी, सिन्नर