शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
4
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
5
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
6
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
7
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
8
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
9
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
10
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
11
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
12
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
13
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
14
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
15
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
16
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
17
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
18
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
19
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
20
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

दारणाचे आवर्तन, प्रशासनाचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:26 IST

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे.

ठळक मुद्देपाणीसाठा संपुष्टात : सिन्नर शहरासह तालुक्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट

सिन्नर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. इंटेक वेलपर्यंत पात्रातील पाणी विद्युतजलपंप टाकून जमा करण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीही दारणा धरणातून आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर जिल्हा प्रशासनाने मौन धरल्याने सिन्नर शहरासह तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा करणाºयावर यंत्रणेवर कमालीचा ताण पडणार आहे. येत्या आठ दिवसात दारणा नदीपात्रात पाण्याचे आर्वतन न सुटल्यास कधी नव्हे एवढ्या पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ सिन्नरकरांसह टॅँकरने पाणीपुरवठा होणाºया गावांवर येणार आहे.सिन्नर शहरास दारणा नदीपात्रातील चेहडी बंधाºयातून पाणीपुरवठा होत असतो. मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीपात्र कोरडे पडल्याने इंटेक विहिरीत पाणी येत नाही. त्यामुळे नदीपात्रात खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी विद्युत जलपंप टाकून ते एका मोठ्या खड्ड्यात जमा करून त्याचा उपसा करण्याची वेळ नगर परिषदेवर आली आहे. जवळच्या खड्ड्यातील पाणी एकत्र करून उपसा करत जास्तीत जास्त सात दिवस पाणी पुरेल इतकेच पाणी नदीपात्रात आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होणार आहे. जी अवस्था नगर परिषदेची आहे तीच अवस्था एमआयडीसी निर्माण झाली आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रावर टंचाईचे मोठे सावट निर्माण झाले आहे. दारणा नदीपात्रातून सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसी, भगूर नगर परिषद, देवळाली कॅम्प व नाशिकरोडच्या काही भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. या पाचही जणांनी दारणा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत पाणीसाठा लवकर संपल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. नियोजित आवर्तन मे महिन्यात असताना एप्रिलमध्येच पाणी संपल्याने अवैध पाणी उपशाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित करण्यात आला.सिन्नर शहराला केवळ सात दिवस पाणी पुरेल इतके पाणी कसेबसे उपलब्ध केले जात आहे. आवर्तन न सुटल्यास टंचाई वाढणार आहे. खासगी टॅँकरचालकांची बैठक घेऊन कोणत्या विहिरींतून पाणी उपलब्ध करून घेता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. दारणा धरणातच कमी साठा असल्याने आवर्तन सुटत नाही तोपर्यंत पाणी जपून वापरण्याचे आवाहन आहे. सिन्नरकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासह सहकार्य करावे.-व्यंकटेश दूर्वास, मुख्याधिकारी, सिन्नर