शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जलयुक्तमधून गाळ काढण्याची कामे वगळली

By admin | Updated: July 21, 2016 01:13 IST

सदस्यांना धक्का : नव्याने प्रस्ताव करावे लागणार

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेसमधून राखीव ठेवण्यात आलेल्या सुमारे अडीच कोटींच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमधून बंधारे आणि पाझरतलावांमधून गाळ काढण्याची तसेच खोलीकरणाची कामे वगळण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या वतीने सेसमधून राखीव ठेवण्यात आलेल्या सुमारे अडीच कोटींच्या निधीतून ७६ कामांचे प्रस्ताव लघुपाटबंधारे विभागाने तयार केले होते; मात्र या प्रस्तावांमध्ये काही कामे ही जलयुक्त शिवार अभियानातील मंजूर आराखड्यातील नसल्याचे कारण देत ही कामे मंजूर करण्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने नकार दिला होता. तसेच हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी जिल्हा रोजगार हमी विभागाकडे या कामांचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर रोहयो उपजिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांनी ही कामे मंजूर करण्यासाठी १० प्रकारच्या अटी-शर्ती घालून दिल्या होत्या. त्या अटी-शर्तींमध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनेतून गाळ काढणे व खोलीकरण करणे ही कामे वगळण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने सादर केलेल्या ७६ कामांपैकी बहुतांश कामे मंजूर करण्यात आली असल्याचे मिलिंद शंभरकर यांनी सांगितले आहे; मात्र त्यातील आराखड्यात समाविष्ट नसलेल्या कोटा बंधारे, गावतळे आणि पाझर तलावातील गाळ काढणे तसेच खोलीकरण करणे ही कामे वगळण्यात आल्याने त्याऐवजी दुसरे प्रस्ताव सुचविण्यास सदस्यांना सूचना करण्यात आल्याचे शंभरकर यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)