शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरणातून काढणार धरणातील रेती, गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:53 IST

आठवडाभरात निविदा : गिरणासह राज्यातील पाच धरणांचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील धरणांमध्ये गाळ व रेती साठल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, नवीन धरणे बांधणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच मोठ्या धरणांमधील गाळ व रेती काढण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्यातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ व सरकारला रेती उत्खननातून पैसा मिळणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या पाच धरणांमध्ये नाशिक जिल्ह्णातील गिरणासह हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द व उजनीचा समावेश आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील धरणांची पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे हाच एकमेव उपाय आहे. नवीन धरणे बांधण्यासाठी भूसंपादन, निधी, पर्यावरणाची हानी, जमीन मालकांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यातील काही धरणांची कामे गेल्या चाळीस वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाहीत परिणामी पाण्याचा प्रश्न कायम राहिला तसेच त्यावरील खर्चही वाया गेला आहे. ते टाळण्यासाठी नवीन धरणे बांधण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणाहून नवीन धरणांची मागणी होईल त्या ठिकाणच्या धरणांमधील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. खासगीकरणातून धरणांमधील गाळ व रेती काढण्याबाबत जलसंपदा विभागाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी ठेका दिला जाईल. ठेकेदारांनी धरणामध्ये किती गाळ व रेती आहे. याचा अभ्यास करून त्यासाठी निविदा भरतील व धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल तर रेती विक्रीतून काही रक्कम ठेकेदार व काही रक्कम राज्य सरकारला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील गिरणा, उजनी, हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द या धरणांना प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या संदर्भातील निविदा काढण्यात येईल, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच आगामी सहा महिन्यांत टप्पाटप्प्याने संपूर्ण राज्यातील धरणांमधील गाळ काढण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविल्यामुळे बऱ्याचशा प्रकल्पांमधून लोकसहभागातून गाळ काढला गेला आहे, त्याचा लाभ पाण्याच्या साठवण क्षमतेवर झाला असल्याची माहितीही जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी दिली. राज्यात सर्वाधिक गाळ नाशिक जिल्ह्णात काढला गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.