शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

खासगीकरणातून काढणार धरणातील रेती, गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:53 IST

आठवडाभरात निविदा : गिरणासह राज्यातील पाच धरणांचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील धरणांमध्ये गाळ व रेती साठल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, नवीन धरणे बांधणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच मोठ्या धरणांमधील गाळ व रेती काढण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्यातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ व सरकारला रेती उत्खननातून पैसा मिळणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या पाच धरणांमध्ये नाशिक जिल्ह्णातील गिरणासह हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द व उजनीचा समावेश आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील धरणांची पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे हाच एकमेव उपाय आहे. नवीन धरणे बांधण्यासाठी भूसंपादन, निधी, पर्यावरणाची हानी, जमीन मालकांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यातील काही धरणांची कामे गेल्या चाळीस वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाहीत परिणामी पाण्याचा प्रश्न कायम राहिला तसेच त्यावरील खर्चही वाया गेला आहे. ते टाळण्यासाठी नवीन धरणे बांधण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणाहून नवीन धरणांची मागणी होईल त्या ठिकाणच्या धरणांमधील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. खासगीकरणातून धरणांमधील गाळ व रेती काढण्याबाबत जलसंपदा विभागाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी ठेका दिला जाईल. ठेकेदारांनी धरणामध्ये किती गाळ व रेती आहे. याचा अभ्यास करून त्यासाठी निविदा भरतील व धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल तर रेती विक्रीतून काही रक्कम ठेकेदार व काही रक्कम राज्य सरकारला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील गिरणा, उजनी, हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द या धरणांना प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या संदर्भातील निविदा काढण्यात येईल, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच आगामी सहा महिन्यांत टप्पाटप्प्याने संपूर्ण राज्यातील धरणांमधील गाळ काढण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविल्यामुळे बऱ्याचशा प्रकल्पांमधून लोकसहभागातून गाळ काढला गेला आहे, त्याचा लाभ पाण्याच्या साठवण क्षमतेवर झाला असल्याची माहितीही जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी दिली. राज्यात सर्वाधिक गाळ नाशिक जिल्ह्णात काढला गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.